India attack pakistan: १०० किमी आत घुसून मारले...५४ वर्षांनी तीन्ही दलांनी मिळून केली पाकिस्तानवर कारवाई

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला आहे. ही कारवाई ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आली. विशेष बाब म्हणजे यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तीनही दलांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. १९७१ नंतर ही पहिली वेळ आहे जेव्हा भारताच्या तीनही दलांनी एकत्रितपणे पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली.



१०० किमी आत घुसून मारले


भारताने पाकिस्तान आणि पीओकेच्या ज्या ९ ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला त्यात काही आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर स्थित आहेत. खासकरून बहावलूपर जो एकेकाळी जैश-ए-मोहम्मदचा गढ मानला जात होता हे ठिकाण १०० किमी दूर आहे. तर मुरीदके ३० किमी आणि गुलपूर ३५ किमी आत आहे.



दहशतवादी ठिकाणांवर थेट हल्ला


या ऑपरेशनमध्ये एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य बनवण्यात आले. यात जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर येथील मुख्यालय आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुरीदके येथील ठिकाणांचा समावेश आहे. सैन्याच्या मते, याच ठिकाणी भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना बनवण्यात आली होती आणि त्यांनाच टार्गेट करण्यात आले.



कसा झाला हल्ला?


तीनही दलांनी या ऑपरेशनमध्ये आपल्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. खासकरून Loitering Ammunitionचा उपयोग झाला जे सरळ शत्रूच्या टार्गेटला लक्ष्य करतात. तसेच तिथेच ब्लास्ट करतात.



संयमी मात्र कडक कारवाई


भारतीय लष्कराने हे ही म्हटले की हे ऑपरेशन पूर्णपणे संयमी, योग्य पद्धतीचे होते. भारताने टार्गेट निवडीचे काम अतिशय विचारपूर्वक केले तसेच दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला केला. हे पाऊल पहलगाम हल्ल्यानंतर उचलण्यात आले.



पंतप्रधान मोदी आणि NSA डोवाल यांनी सांभाळली कमान


सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण रात्रभर या ऑपरेशनवर लक्ष ठेवले. ऑपरेशन पूर्ण होताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकी NSA आणि परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना संपूर्ण माहिती दिली.

Comments
Add Comment

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.