India attack pakistan: १०० किमी आत घुसून मारले...५४ वर्षांनी तीन्ही दलांनी मिळून केली पाकिस्तानवर कारवाई

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला आहे. ही कारवाई ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आली. विशेष बाब म्हणजे यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तीनही दलांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. १९७१ नंतर ही पहिली वेळ आहे जेव्हा भारताच्या तीनही दलांनी एकत्रितपणे पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली.



१०० किमी आत घुसून मारले


भारताने पाकिस्तान आणि पीओकेच्या ज्या ९ ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला त्यात काही आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर स्थित आहेत. खासकरून बहावलूपर जो एकेकाळी जैश-ए-मोहम्मदचा गढ मानला जात होता हे ठिकाण १०० किमी दूर आहे. तर मुरीदके ३० किमी आणि गुलपूर ३५ किमी आत आहे.



दहशतवादी ठिकाणांवर थेट हल्ला


या ऑपरेशनमध्ये एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य बनवण्यात आले. यात जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर येथील मुख्यालय आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुरीदके येथील ठिकाणांचा समावेश आहे. सैन्याच्या मते, याच ठिकाणी भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना बनवण्यात आली होती आणि त्यांनाच टार्गेट करण्यात आले.



कसा झाला हल्ला?


तीनही दलांनी या ऑपरेशनमध्ये आपल्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. खासकरून Loitering Ammunitionचा उपयोग झाला जे सरळ शत्रूच्या टार्गेटला लक्ष्य करतात. तसेच तिथेच ब्लास्ट करतात.



संयमी मात्र कडक कारवाई


भारतीय लष्कराने हे ही म्हटले की हे ऑपरेशन पूर्णपणे संयमी, योग्य पद्धतीचे होते. भारताने टार्गेट निवडीचे काम अतिशय विचारपूर्वक केले तसेच दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला केला. हे पाऊल पहलगाम हल्ल्यानंतर उचलण्यात आले.



पंतप्रधान मोदी आणि NSA डोवाल यांनी सांभाळली कमान


सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण रात्रभर या ऑपरेशनवर लक्ष ठेवले. ऑपरेशन पूर्ण होताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकी NSA आणि परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना संपूर्ण माहिती दिली.

Comments
Add Comment

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान