मिठी प्रकल्पात ६५ कोटींचा अपहार; बीएमसीचे ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३ दलाल आणि २ खाजगी कंपनी प्रतिनिधी अशा एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

  92

१००० कोटींचा संशयित घोटाळा


मुंबई : मुंबईतील मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील मोठा घोटाळा उघड झाला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३ दलाल आणि २ खाजगी कंपनी प्रतिनिधी अशा एकूण १३ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.


या आरोपींनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला तब्बल ६५.५४ कोटींचा आर्थिक फटका दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील एकूण घोटाळा १००० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.


आज सकाळपासून विशेष तपास पथकाने मुंबईतील ८–९ ठिकाणी छापे टाकले, ज्यामध्ये ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांचे घर व कार्यालये तपासली जात आहेत. विशेष तपास पथकाच्या प्राथमिक तपासावर आधारित गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



या कारवाईत कै. काशिवाल (कैलाश कन्स्ट्रक्शन), ऋषभ जैन (अक्युट एन्टरप्रायझेस), आणि शेरसिंह (मंदीप एन्टरप्रायझेस) या तीन ठेकेदारांना समन्स बजावण्यात आले आहेत.


२००५ पासून सुरू असलेल्या १७.८ किमी लांब मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रकल्पावर १३०० कोटी खर्च करण्यात आले. या पैशांचा उपयोग खरोखर झाला का, की तो खोट्या करारपत्रांच्या आधारे अपहार केला गेला, हे तपासण्यात येत आहे.


आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त व्ही. डी. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही