MI vs GT, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर महत्वपूर्ण लढत

मुंबई(सुशील परब): मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर आज महत्त्वपूर्ण लढत होत आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत समान गुणांवर आहेत (चौदा गुण) जो संघ विजयी होईल तो गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर जाईल. मुंबई इंडियन्सने सलग सहा विजय मिळविलेले आहेत, त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. गुजरात टायटन्स पण काही कमी नाही त्यांनी दहा सामन्यात सात विजय मिळविलेले आहेत त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल यात शंकाच नाही.


रोहीत शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक बर्मा हे फलंदाज फॉर्मात आहेत त्यामुळे त्यांची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजीही चांगली होत आहे. जसप्रित बुमराह, टेंट बोल्ट, दोपक चहर, कर्ण शर्मा, मिचेल सेंटनर असे चांगले गोलंदाज मुंबईच्या संघात आहेत. गुजरात संघाला देखील कमी लेखून चालणार नाही त्यांचे साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, ज्योस बटलर, शाहरुख खान हे सातत्याने धावा करत आहेत.


गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, कैसिगो रबाडा, रशिद खान, वाशिग्टन सुंदर, प्रसिद्ध क्रिष्णा असे चांगले गोलंदाज आहेत वानखेडे स्टडियम हे फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल. अगोदरच्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव केला होता, आज मुंबई त्या पराभवाचा बदला घेणार? बघुया गुजरात टाषटन्स मुंबई इंडियन्सला रोखेल का की मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला हरवून सातवा विजय मिळवतो का ते पाहूया.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत