MI vs GT, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर महत्वपूर्ण लढत

  2075

मुंबई(सुशील परब): मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर आज महत्त्वपूर्ण लढत होत आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत समान गुणांवर आहेत (चौदा गुण) जो संघ विजयी होईल तो गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर जाईल. मुंबई इंडियन्सने सलग सहा विजय मिळविलेले आहेत, त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. गुजरात टायटन्स पण काही कमी नाही त्यांनी दहा सामन्यात सात विजय मिळविलेले आहेत त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल यात शंकाच नाही.


रोहीत शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक बर्मा हे फलंदाज फॉर्मात आहेत त्यामुळे त्यांची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजीही चांगली होत आहे. जसप्रित बुमराह, टेंट बोल्ट, दोपक चहर, कर्ण शर्मा, मिचेल सेंटनर असे चांगले गोलंदाज मुंबईच्या संघात आहेत. गुजरात संघाला देखील कमी लेखून चालणार नाही त्यांचे साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, ज्योस बटलर, शाहरुख खान हे सातत्याने धावा करत आहेत.


गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, कैसिगो रबाडा, रशिद खान, वाशिग्टन सुंदर, प्रसिद्ध क्रिष्णा असे चांगले गोलंदाज आहेत वानखेडे स्टडियम हे फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल. अगोदरच्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव केला होता, आज मुंबई त्या पराभवाचा बदला घेणार? बघुया गुजरात टाषटन्स मुंबई इंडियन्सला रोखेल का की मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला हरवून सातवा विजय मिळवतो का ते पाहूया.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र