“सिंधूचे पाणी आता देशाच्या उपयोगी पडेल”- पंतप्रधान

नवी दिल्ली : पूर्वी भारताचे पाणी बाहेर जात असे. परंतु, आता देशाच्या हिसासाठी वापरले जाईल आणि आपल्या हिताचे ठरेल असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सिंधू पाणी करार संपुष्टात आणल्यानंतर पंतप्रधानांनी आज, मंगळवारी पहिल्यांदाच यासंदर्भात सार्वजनिक विधान केले आहे.


यासंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे पाणी पूर्वी बाहेर जात असे, आता ते भारताच्या हितासाठी राहील आणि देशासाठी उपयुक्त ठरेल. जे पाणी पूर्वी भारताच्या सीमेबाहेर वाहत होते ते पाणी आता भारत सरकार थांबवून देशाच्या हितासाठी वापरण्याची योजना आखत आहे.


एक काळ असा होता की कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्यापूर्वी लोक जग काय विचार करेल याचा विचार करायचे. ते विचार करायचे की त्यांना मते मिळतील की नाही, त्यांची जागा सुरक्षित राहील की नाही. या कारणांमुळे मोठ्या सुधारणांना विलंब झाला. कोणताही देश अशा प्रकारे पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा आपण राष्ट्राला प्रथम स्थान देतो तेव्हाच देशाची प्रगती होते असे पंतप्रधानांनी सांगितले. सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेवरील सरकारची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने (सीसीएस) घेतला. भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील. या कराराच्या स्थापनेपासून भारताने पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यावर व्हेटो केला आहे.


सिंधू पाणी करारांतर्गत, भारत 1960 पासून सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्याचा मोठा वाटा पाकिस्तानला देत आहे, तर भारत सतलज, रावी आणि बियास नद्यांचे पाणी वापरतो. परंतु अलिकडच्या काळात भारताने आपल्या वाट्याचे पाणी पुरेपूर वापरावे जेणेकरून देशातील शेती, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.

Comments
Add Comment

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चतरू भागात सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. सुरक्षा

कौतुकास्पद! भारतीय वंशाच्या महिलेची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओपदी नियुक्ती

भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून तमिळनाडूमधून सहा आतंकवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने तमिळनाडूमधून सहा संशयित

Srinagar Accident : सीआरपीएफच्या बंकर वाहनाचा अपघात; सात जवान जखमी

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणारे बुलेटप्रूफ बंकर वाहन कालव्यामध्ये

AI Impact Summit 2026 ची सांगता; तब्बल ८८ देश आणि संघटनांनी केली घोषणापत्रावर स्वाक्षरी

नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-२०२६ ची सांगता झाली. यावेळी इंडिया एआय

भारत-ब्राझील द्विपक्षीय व्यापार करारावर शिक्कामोर्तब

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी नवी दिल्ली  : भारत आणि