“सिंधूचे पाणी आता देशाच्या उपयोगी पडेल”- पंतप्रधान

नवी दिल्ली : पूर्वी भारताचे पाणी बाहेर जात असे. परंतु, आता देशाच्या हिसासाठी वापरले जाईल आणि आपल्या हिताचे ठरेल असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सिंधू पाणी करार संपुष्टात आणल्यानंतर पंतप्रधानांनी आज, मंगळवारी पहिल्यांदाच यासंदर्भात सार्वजनिक विधान केले आहे.


यासंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे पाणी पूर्वी बाहेर जात असे, आता ते भारताच्या हितासाठी राहील आणि देशासाठी उपयुक्त ठरेल. जे पाणी पूर्वी भारताच्या सीमेबाहेर वाहत होते ते पाणी आता भारत सरकार थांबवून देशाच्या हितासाठी वापरण्याची योजना आखत आहे.


एक काळ असा होता की कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्यापूर्वी लोक जग काय विचार करेल याचा विचार करायचे. ते विचार करायचे की त्यांना मते मिळतील की नाही, त्यांची जागा सुरक्षित राहील की नाही. या कारणांमुळे मोठ्या सुधारणांना विलंब झाला. कोणताही देश अशा प्रकारे पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा आपण राष्ट्राला प्रथम स्थान देतो तेव्हाच देशाची प्रगती होते असे पंतप्रधानांनी सांगितले. सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेवरील सरकारची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने (सीसीएस) घेतला. भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील. या कराराच्या स्थापनेपासून भारताने पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यावर व्हेटो केला आहे.


सिंधू पाणी करारांतर्गत, भारत 1960 पासून सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्याचा मोठा वाटा पाकिस्तानला देत आहे, तर भारत सतलज, रावी आणि बियास नद्यांचे पाणी वापरतो. परंतु अलिकडच्या काळात भारताने आपल्या वाट्याचे पाणी पुरेपूर वापरावे जेणेकरून देशातील शेती, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.

Comments
Add Comment

Nirmala Sitharaman : ऐतिहासिक बजेटला कांजीवरमचा थाट! अर्थसंकल्पाआधीच निर्मला सीतारमण यांच्या साडीची पडली भुरळ...

नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला सलग नवा

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे

किश्तवाड जिल्ह्यातील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा

राम मंदिर गर्भगृहात ४०० वर्षं जुन्या संस्कृत वाल्मीकी रामायणाची प्रत

मंदिराच्या भित्तिचित्र आणि इतर सुविधा अंतिम टप्प्यात अयोध्या : श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या

एआयच्या सल्ल्यामुळे ४५ वर्षीय व्यक्ती आजाराच्या विळख्यात

नवी दिल्ली : वैद्यकीय उपचारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आंधळेपणाने विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते,

‘मेड इन इंडिया’ अनमॅन्ड क्राफ्ट भारतीय नौसेनेत

नवी दिल्ली : भारतीय नौसेनेच्या क्षमतेत लवकरच मोठी भर पडणार आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या