देशविरोधी विधाने करणाऱ्यांची आता खैर नाही... सरकारने उचलले हे पाऊल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. यातच सोशल मीडियावर भडकावणारी तसेच अपमानजनक पोस्ट शेअर केले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये यात कारवाईही झाली मात्र आता याबाबत संसदेच्या स्थायी समितीने रिपोर्ट जारी केला आहे.


संसदेच्या स्थायी समितीने म्हटले की, २२ एप्रिल २०२५मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्म राष्ट्रहिताविरोधात कार्य करत आहे. यामुळे हिंसा भडकू शकते.


 


काय म्हटलेय समितीने?


समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाला विनंती केली आहे की, देशहिताविरोधात काम करणारे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर आयटी कायदा २००० आणि सूचना प्रौद्योगिकी नियम २०२१ अंतर्गत अशा प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी काय कारवाई करण्यात आली आहे आणि काय केली जाणार आहे, याची माहिती दिली जावी.



८ मे पर्यंत मागितले उत्तर


रिपोर्ट्सनुसार समितीने ८ मेपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाकडून माहिती घेण्यास सांगितले आहे.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर