देशविरोधी विधाने करणाऱ्यांची आता खैर नाही... सरकारने उचलले हे पाऊल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. यातच सोशल मीडियावर भडकावणारी तसेच अपमानजनक पोस्ट शेअर केले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये यात कारवाईही झाली मात्र आता याबाबत संसदेच्या स्थायी समितीने रिपोर्ट जारी केला आहे.


संसदेच्या स्थायी समितीने म्हटले की, २२ एप्रिल २०२५मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्म राष्ट्रहिताविरोधात कार्य करत आहे. यामुळे हिंसा भडकू शकते.


 


काय म्हटलेय समितीने?


समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाला विनंती केली आहे की, देशहिताविरोधात काम करणारे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर आयटी कायदा २००० आणि सूचना प्रौद्योगिकी नियम २०२१ अंतर्गत अशा प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी काय कारवाई करण्यात आली आहे आणि काय केली जाणार आहे, याची माहिती दिली जावी.



८ मे पर्यंत मागितले उत्तर


रिपोर्ट्सनुसार समितीने ८ मेपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाकडून माहिती घेण्यास सांगितले आहे.

Comments
Add Comment

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा

जलद डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर सरकारची भूमिका; क्विक कॉमर्स कंपन्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली :ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने

मासिक पाळीतील तीव्र वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू; महिलांच्या आरोग्याविषयी गंभीर प्रश्न

कर्नाटक : मासिक पाळीशी संबंधित वेदना अनेकदा हलक्याने घेतल्या जातात. मात्र अशा वेदना एखाद्या व्यक्तीसाठी प्रचंड