देशविरोधी विधाने करणाऱ्यांची आता खैर नाही... सरकारने उचलले हे पाऊल

  107

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. यातच सोशल मीडियावर भडकावणारी तसेच अपमानजनक पोस्ट शेअर केले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये यात कारवाईही झाली मात्र आता याबाबत संसदेच्या स्थायी समितीने रिपोर्ट जारी केला आहे.


संसदेच्या स्थायी समितीने म्हटले की, २२ एप्रिल २०२५मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्म राष्ट्रहिताविरोधात कार्य करत आहे. यामुळे हिंसा भडकू शकते.


 


काय म्हटलेय समितीने?


समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाला विनंती केली आहे की, देशहिताविरोधात काम करणारे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर आयटी कायदा २००० आणि सूचना प्रौद्योगिकी नियम २०२१ अंतर्गत अशा प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी काय कारवाई करण्यात आली आहे आणि काय केली जाणार आहे, याची माहिती दिली जावी.



८ मे पर्यंत मागितले उत्तर


रिपोर्ट्सनुसार समितीने ८ मेपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाकडून माहिती घेण्यास सांगितले आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला