इतिहासात नोंदवलं जाणारं पाऊल! भारत-यूके दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

India-UK Free Trade Agreement पूर्ण; व्यापार, रोजगार आणि नाविन्याला नवे बळ


नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम (UK) दरम्यानचा महत्त्वाकांक्षी व परस्पर हिताचा Free Trade Agreement (FTA) अखेर पूर्ण झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूकेचे नविन पंतप्रधान कीअर स्टार्मर (Keir Starmer) यांनी याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून गौरव केला आहे.





पंतप्रधान मोदींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले, "माझ्या मित्र PM @Keir_Starmer यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. भारत-यूकेने महत्त्वाकांक्षी आणि परस्पर हिताचा मुक्त व्यापार करार यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्याचबरोबर डबल कॉन्ट्रिब्युशन कन्वेन्शनलाही अंतिम स्वरूप देण्यात आले आहे."





या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, नवोपक्रम व नावीन्य यांना चालना मिळेल. Comprehensive Strategic Partnership अजून मजबूत होईल आणि नव्या संधी खुल्या होतील, असं दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे.


कीअर स्टार्मर यांनी नमूद केलं की, "जगभरातील अर्थव्यवस्थांशी व्यापार अडथळे कमी करून भागीदारी वाढवणं हेच आमच्या 'Plan for Change' चं मुख्य उद्दिष्ट आहे."


या मुक्त व्यापार करारामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश आहे आणि तो नवीन रोजगार निर्मिती, उच्च जीवनमान, आणि उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांना लवकरच भारतभेटीस येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही