कल्याण शीळ रोड येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार कधी?

मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक नियंत्रण शाखा हतबल


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक जण काम उद्योग-धंद्यासाठी कल्याण शीळ रोडचा जा-ये वापर करावा लागतो कारण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र या वाहतूक कोंडीला जबाबदार असलेली बेकायदेशीर बांधकाम, ती हटविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा व महापालिकेने २०१५ ते २०२५ या वर्षात काही उपाययोजना केल्या आहेत का या विषयावर माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकारी यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत हे नाही किंवा पाठपुरावा ही केला नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.



कल्याण शीळ रोड पूर्वी दोन पदरी होता त्याचा चारपदरी झाला आतातर तो सहापदरी होऊन ही वाहतूक कोंडी मात्र न सुटता दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्या आता मेट्रोचे काम सुरू आहे त्यामुळे जागोजागी मेट्रोचे आवर अवाढव्य खांब उभारण्यात येत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.ती कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हतबल आहेत. दुसरे असे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना दंड वसूल करण्यासाठी कोटा पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागते.



उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार


या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून मनसे सरसावली असून त्याविषयी माहिती देताना मनसे पदाधिकारी अरुण जांबळे म्हणाले की आंदोलन करण्यात आले होते आता याविषयावर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत. रस्ते विकासासाठी आड येत असलेली बांधकामे पण ती तोडू नये ही त्यासाठी राजकीय दबाव येत आहे. सकाळच्या वेळी मुंबईकडे जाताना व सायंकाळी डोंबिवली-कल्याणकडे परत येताना अनेक वेळ वाहतूक कोंडी होते.काही वेळा तर तासंतास होते. या साठी वाहतूक नियंत्रण शाखेत कर्मचारी कमी आहेत असे उत्तर दिले जात आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने शासनाने बघणे जरूरीचे आहे मंत्री महोदय येतात तेव्हा वाहतूक कोंडी का होत नाही हा प्रश्न सातत्याने विचारला जातो.

Comments
Add Comment

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.