कल्याण शीळ रोड येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार कधी?

मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक नियंत्रण शाखा हतबल


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक जण काम उद्योग-धंद्यासाठी कल्याण शीळ रोडचा जा-ये वापर करावा लागतो कारण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र या वाहतूक कोंडीला जबाबदार असलेली बेकायदेशीर बांधकाम, ती हटविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा व महापालिकेने २०१५ ते २०२५ या वर्षात काही उपाययोजना केल्या आहेत का या विषयावर माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकारी यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत हे नाही किंवा पाठपुरावा ही केला नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.



कल्याण शीळ रोड पूर्वी दोन पदरी होता त्याचा चारपदरी झाला आतातर तो सहापदरी होऊन ही वाहतूक कोंडी मात्र न सुटता दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्या आता मेट्रोचे काम सुरू आहे त्यामुळे जागोजागी मेट्रोचे आवर अवाढव्य खांब उभारण्यात येत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.ती कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हतबल आहेत. दुसरे असे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना दंड वसूल करण्यासाठी कोटा पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागते.



उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार


या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून मनसे सरसावली असून त्याविषयी माहिती देताना मनसे पदाधिकारी अरुण जांबळे म्हणाले की आंदोलन करण्यात आले होते आता याविषयावर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत. रस्ते विकासासाठी आड येत असलेली बांधकामे पण ती तोडू नये ही त्यासाठी राजकीय दबाव येत आहे. सकाळच्या वेळी मुंबईकडे जाताना व सायंकाळी डोंबिवली-कल्याणकडे परत येताना अनेक वेळ वाहतूक कोंडी होते.काही वेळा तर तासंतास होते. या साठी वाहतूक नियंत्रण शाखेत कर्मचारी कमी आहेत असे उत्तर दिले जात आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने शासनाने बघणे जरूरीचे आहे मंत्री महोदय येतात तेव्हा वाहतूक कोंडी का होत नाही हा प्रश्न सातत्याने विचारला जातो.

Comments
Add Comment

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी