दादर धारावी नाल्याची सफाई की, डोळ्यात धुळफेक?

मशिन उतरवली, पुढे काय? रहिवाशांचे प्रश्न


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत नालेसफाईचे काम तब्बल ३७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, या नालेसफाई अंतर्गत माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात तुंबणाऱ्या पाण्याला कारणीभूत ठरणाऱ्या दादर धारावी नाल्याच्या सफाईला मागील ३ एप्रिल रोजी सुरुवात झाली आणि या सफाईसाठी दादरच्या दिशेने मशिनही नाल्यात उतरवण्यात आली होती. मात्र, नाल्याचा अर्धा किलोमीटरच्या परिसरात आजही सफाई झालेली नसून नाल्यात उतरलेले वाहन गेले कुठे? अदृश्य झाले का असा प्रश्न येथील नागरिकांना पडू लागला आहे.


तब्बल महिनाभरापूर्वी हे वाहन सफाईसाठी नाल्यात उतरूनही या नाल्याची सफाई न झाल्याने केवळ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी हे केले जाते की खरोखरच सफाई केली जाते असा सवाल उपस्थित केला जात आहे. दादर धारावी नाल्याच्या सफाईला सुरुवात केल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी प्रत्यक्षात या नाल्याची सफाईच अद्याप झालेली नाही. या नाल्याच्या शेजारी कमला रामन नगर वसाहत, माटुंगा पश्चिम रेल्वे अधिकारी वसाहत तसेच पुढील बाजुस मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे वसाहत आणि आझाद नगर, मेघवाडी आदी वसाहती येत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्याला जोडणाऱ्या उपनाल्यांमुळे आत्तपासच्या परिसरात पाणी तुंबणे तसेच रेल्वे मार्गावर पाणी तुंबणे असे प्रकार घडत असतात.


माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात तुंबणाऱ्या पाण्यामुळे या नाल्याची सफाई ही महत्वाची मानली जाते आणि नाल्यामुळे कमला रामन नगर वसाहतीतील प्रत्येक घरात पाणी शिरुन त्यांचे संसार वाहून जात असतात. परंतु प्रत्येकवेळी या नाल्याच्या सफाईचा प्रश्न उपस्थित होत असतो. बऱ्याचदा नाल्यातील गाळ बाजुला करुन ठेवला जातो किंवा पुढे ढकलून आणून बाहेर काढला जातो. परंतु यंदा २ एप्रिल रोजीच या नाल्यात मशिन उतरवले गेले होते, तशी छायाचित्रेही पर्जन्य जलवाहिनी विभागाचे शहराचे उपप्रमुख अभियंता बांना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी पाठवले होते. परंतु आजतागायत नाल्यात उतरलेले हे वाहन पुढील भागांत कुणाला दिसले नाही की या भागातील सफाई झाल्याचे कुठे दिसून आले नाही. त्यामुळे या माटुंगा पश्चिम येथील या नाल्याची सफाई खरोखरच कंत्राटदाराला करायची आहे की या वस्तीत पाणी शिरुन लोकांचे संसार वाहून जावे अशी अधिकाऱ्यांची इच्छा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येथील भागांमध्ये जर पावसाळ्यात पाणी शिरल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून महापालिका अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई