
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामाची दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीचे चारही सामने जिंकून दणक्यात सुरुवात केली, मात्र त्यांना पहिला बेक मुंबई इंडियन्सने लावला. मागील दोन सामन्यांव दिल्लीचा पराभव झाला त्यामुळे आजमा सामना जिंकणे त्यांना गरजेचे आहे. १२ गुणांसह दिल्ली पाचव्या स्थानावर आहे, आज प्रत्येक संघात पात्रता फेरीसाठी रस्सीखेच सुरू असून तळाचे संघ गुण तक्त्यातील अव्वल संधाना सहजासहजी जिंकू देत नाही आहे.
दिल्लीचा प्रतिस्पर्धी हैदराबादचा संघ जो अगोदरच पात्रता फेरीतून बाहेर पडला आहे. असे असले तरी हैदराबाद आज दिल्लीला सहज विजय मिळवू देणार नाही. हैदराबादचे फलंदाज सध्या खेळत नाही आहेत, परंतु टी-२० मध्ये कधी कोणाची फलंदाजी चांगली होईल हे सांगता येणार नाही.
दिल्लीला आजचा सामना जिंकावा लागेल याचे आणखी एक कारण म्हणजे यानंतरचे तिन्ही सानने पात्रता फेरीतील संघाविरुद्ध होणार आहेत आणि ते जिंकणे सोपे नाही, आज दिल्लीसाठी सोनेरी सथी आहे ती जर गमावली, तर पुढचा प्रवास दिल्लीसाठी कठीण असेल.
चला तर बघूया दिल्लीला विजयाचा मार्ग सापडतो का?