‘एस ॲण्ड पी’ कडून आर्थिक विकास दर अंदाज घटून ६.३ टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):  अमेरिकेच्या व्यापार शुल्कासंबंधित धोरण अनिश्चिततेमुळे ‘एस ॲण्ड पी’ने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा (जीडीपी) अंदाज शुक्रवारी ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. अतिरिक्त व्यापारशुल्कामुळे अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या नकारात्मक परिणामांचा हवाला देत चालू आर्थिक वर्षासाठी वाढीचा अंदाज आधी वर्तवलेल्या ६.५ टक्क्यांवरून ०.२ टक्क्यांनी घटवला आहे.


‘ग्लोबल मॅक्रो अपडेट-अमेरिकेच्या व्यापार धोरणातील बदल जागतिक विकासाला गती देईल’ या शीर्षकाच्या अहवालात ‘एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने म्हटले आहे की, अमेरिकेसह जगाच्या वाढत्या संरक्षणवादी धोरण परिस्थितीत कोणालाही होणार नाही. आशिया-प्रशांत क्षेत्रातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये, चीनचा विकास २०२५ मध्ये ०.७ टक्क्यांनी कमी होऊन ३.५ टक्के आणि २०२६ मध्ये ३ टक्के होण्याची अपेक्षा आहे, तर आशियातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा विकासदर २०२५-२६ मध्ये ६.३ टक्के आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षात ६.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मार्चमध्ये, ‘एस ॲण्ड पी’ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केला होता. अमेरिकेच्या धोरण अनिश्चिततेचा जागतिक पटलावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन रचनेमध्ये देखील बदल होण्याची भीती आहे. विनिमय दरातील चढ-उतारांबद्दल, देखील ‘एस ॲण्ड पी’ने चिंता व्यक्त केली असून कॅलेंडर वर्ष २०२५ च्या अखेरीस डॉलरच्या तुलनेत रुपयात आणखी घट होण्याची शक्यता आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया ८४ च्या पातळीवर आहे.


अमेरिकी अर्थव्यवस्था या वर्षी १.५ टक्के आणि पुढील वर्षात १.७ टक्के दराने वाढीची अपेक्षा आहे. अमेरिकेचे व्यापारशुल्क धोरण तीन गटात विभागले जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी चीनसह, द्विपक्षीय व्यापार असंतुलन राहण्याची शक्यता असून दीर्घकालावधीत तणाव कायम राहण्याची शक्यता आहे, तर युरोपियन युनियनचे व्यापार संबंध गुंतागुंतीचे असण्याची शक्यता आहे, आणि कॅनडा अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेवर ठाम भूमिका घेण्याचा विचार करत आहे. बहुतेक उर्वरित देशदेखील अमेरिकेवर अतिरिक्त व्यापारशुल्क लादण्याऐवजी चर्चेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे ‘एस ॲण्ड पी’ने म्हटले आहे.

Comments
Add Comment

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या

भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा एलिसा हेलीला विजयी निरोप

पर्थ : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस