Pune News : पुणेकरांना मिळणार उकाड्यापासून दिलासा! अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना (Pune News) भेडसावत असलेल्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. शहरातील कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट झाली, तर किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली. त्यामुळे पुणे शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र त्यानंतर चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Pune Unseasonal Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून (Meteorological Department) ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.



पुणे आणि परिसरात आकाशामध्ये ढगांची सतत वर्दळ होती. काही वेळा सूर्य ढगांच्या आड लपला होता, त्यामुळे दिवसभर हवामानात एक प्रकारची दमट आणि गडद छाया जाणवत होती. शहरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. कमाल तापमानात झालेली ही घसरण पुणेकरांसाठी सुखद ठरली. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हवेत जाणवणारा गारवा उकाड्यापासून दिलासा देणारा ठरला.


पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून, किमान तापमानात वाढ होणार आहे. त्यानंतर मात्र पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून विजांचा कडकडाट होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (Pune Unseasonal Rain Alert)



राज्यभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा


सध्या चक्राकार वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रालगतच्या राजस्थान आणि मध्यप्रदेशात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सागर किनारपट्टीलगतचा भाग वगळता उर्वरित राज्यात उद्या ४ मे ला वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तर ५ आणि ६ मे ला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Weather Update)


दरम्यान, विदर्भातील नागपूरसह वर्धा आणि भंडारामध्ये पुढील काही तास ढगाळ वातावरण राहणार असून वादळी वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर पुढील २ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. यामध्ये वीजांच्या गडगडाटाचीही शक्यता आहे. ४० ते ५० किमी ताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावणार


गत वर्षीप्रमाणे, यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे. मान्सूनवर एल निनो, ला निना किंवा हिंद महासागरातील द्विध्रुवीय घटकांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका आणि वेळेत दाखल होईल, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संशोधक आणि मान्सून अभ्यासक डॉ. एम. आर. रमेश कुमार यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी