Pune News : पुणेकरांना मिळणार उकाड्यापासून दिलासा! अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना (Pune News) भेडसावत असलेल्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. शहरातील कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट झाली, तर किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली. त्यामुळे पुणे शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र त्यानंतर चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Pune Unseasonal Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून (Meteorological Department) ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.



पुणे आणि परिसरात आकाशामध्ये ढगांची सतत वर्दळ होती. काही वेळा सूर्य ढगांच्या आड लपला होता, त्यामुळे दिवसभर हवामानात एक प्रकारची दमट आणि गडद छाया जाणवत होती. शहरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. कमाल तापमानात झालेली ही घसरण पुणेकरांसाठी सुखद ठरली. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हवेत जाणवणारा गारवा उकाड्यापासून दिलासा देणारा ठरला.


पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून, किमान तापमानात वाढ होणार आहे. त्यानंतर मात्र पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून विजांचा कडकडाट होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (Pune Unseasonal Rain Alert)



राज्यभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा


सध्या चक्राकार वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रालगतच्या राजस्थान आणि मध्यप्रदेशात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सागर किनारपट्टीलगतचा भाग वगळता उर्वरित राज्यात उद्या ४ मे ला वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तर ५ आणि ६ मे ला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Weather Update)


दरम्यान, विदर्भातील नागपूरसह वर्धा आणि भंडारामध्ये पुढील काही तास ढगाळ वातावरण राहणार असून वादळी वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर पुढील २ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. यामध्ये वीजांच्या गडगडाटाचीही शक्यता आहे. ४० ते ५० किमी ताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावणार


गत वर्षीप्रमाणे, यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे. मान्सूनवर एल निनो, ला निना किंवा हिंद महासागरातील द्विध्रुवीय घटकांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका आणि वेळेत दाखल होईल, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संशोधक आणि मान्सून अभ्यासक डॉ. एम. आर. रमेश कुमार यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह