भारत माझा देश आहे

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड


आपल्या देशाबद्दल स्वाभिमान जागृत व्हावाच अशी सध्याची वेळ आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात, ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशाचा मला अभिमान आहे.’ अशा अर्थाची प्रतिज्ञा छापलेली असते पण दस्तावेज किती तरुण दिलांवर उमटतो? माझे पती आई-वडिलांचे एकुलते अपत्य! पण तरी ते इंडियन आर्मीत शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर होते. राष्ट्रपतीच्या रक्षा मेडलचे मानकरी आहेत ते. १९६५ चे भारत-पाक युद्ध लढले आहेत या सर्व गोष्टी मला सार्थ अभिमान आहे.


मी आयुष्यभर शिक्षिका म्हणून नोकरी केली. शिक्षिका, पर्यवेक्षिका, मुख्याध्यापिका, संचालिका ही सर्व पदे भूषविली. पण तसे करताना एक तास रोज ‘देशाभिमान’ या विषयाशी निगडित असे. त्यामुळे माझे कितीतरी विद्यार्थी भारतीय सैन्य दलात गेले. अगदी डॉक्टर, इंजिनीअर होऊन सुद्धा! त्यांना मी एक गीत नेहमी शिकवीत असे. ते असे...
‘मी भारतीय आहे
मज सार्थ गर्व आहे
माझ्याच भारताचे
मी एक बीज आहे ! ।।१।।
‘काळीच’ आई माझी
मजला अतिव प्यारी
तव प्राण रक्षिण्याला
मम जीव हा करारी ।।२।।
‘गे मायभू तुलाही
अर्पीन भावमाला
माझ्या पवित्र हाते
माझा प्रणाम तुजला’ ।।३।।


माझा प्रत्येक विद्यार्थी भारत प्रेमी व्हावा ही माझी मनोमन इच्छा असे. त्यातून काही विद्यार्थी लष्करात गेले नि मला नमस्कार करायला आले, की माझे मन नि डोळे भरून येत. त्यांना जवळ घेताना, मायेने थोपटताना, काळजाचा ठोका चुके. पण भारतप्रेम आपण जुन्या पिढीकडून तरुणाईकडे सोपवीत आहोत याचा अभिमान वाटे.
एक दिवस माझा उदयांचलचा विद्यार्थी संपूर्ण लष्करी वेषात माझ्या समोर आला. “टीचर, मी आदिल. १९९९ ची बॅच! आठवतं का? एनसीसीचा कोस्ट कॅडेट म्हणून तुम्ही माझ्या युनिफॉर्मवर बिल्ला लावला होता..”


“हो हो आदिल ! आठवते ना!” मी म्हटले.
“तेव्हाच ठरविले होते. भारतीय सैन्यात जायचे.”
“किती छान.”
“माझे सिलेक्शन झालेय.”
“अरे वा ! अभिनंदन आदिल!” मी आनंदले.
“तुम्ही माझ्या आवडत्या शिक्षिका.”
“मला ते ठाऊक आहे आदिल.”
“म्हणून तुम्हाला शोधत आलो. मला समजले की उदयांचल सोडून तुम्ही प्रमोशनवर पोदार स्कूलमध्ये आलात. मग तडक विक्रोळीहून सांताक्रूझला या शाळेत आलो.”
“खूप छान केलंस.”
“मी त्याला आग्रहाने बसविले. चहा नि वडा खायला दिला तो त्यानं आवडीने खाल्ला.
“टीचर, माझं पोस्टींग सियाचेनला झाले आहे.”
“अरे बापरे!” मी घाबरले.
“तो तर डेंजरस आहे ना रे आदिल?”
“अहो सैन्य म्हणजेच धोका ! फार काय होईल? मी शहीद होईन!”
“असे नको रे बोलूस.”
“का टीचर?”
“माझे मन थरकते ! घाबरे होते. मुझे डर लगता है !”
“घाबरू नका टीचर.”
माझे भरून आलेले डोळे आदिलने मायेने पुसले
“हम होंगे कामयाब एक दिन ! हां. हां मनमें है विश्वास! हम होंगे कामयाब एक दिन.” त्याने गात गात मला विश्वास दिला.
“टीचर, एक दिवस विजयी सैनिक म्हणून तुम्हाला भेटायला येईन. तोवर आशीर्वाद द्या.”
“तो वाकला मी आनंदाने रडत रडत म्हणाले, “विजयी भव ! विजयी भव ! भारत माताकी जय ! अखंड भारताचा विजय असो !”

Comments
Add Comment

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला खोल जखम

नोंद-भागा वारखडे देशात दर वर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. हे स्वप्न केवळ करिअरचे नसते, तर

मुमुक्षु : पटलावरचा प्रवास

इतिहासाच्या पाऊलखुणांनी आणि पराक्रमाच्या गाथांनी पावन झालेल्या या भूमीचा वारसदार असणं, यासारखं थोर भाग्य नाही.

मौनम् सर्वार्थ साधनम् ।

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर ही कथा आहे १७व्या दशकातील... त्यावेळी रशियामध्ये झार निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता.

नरक आणि नरक यातना

महाभारतातील मोतीकण -  भालचंद्र ठाकूर पृथ्वीवरील जीव अनेक प्रकारची कर्मे करतो. कर्माचेही सात्त्विक राजस व तामस

‘कोकणात आहे माहेर माझं...’

नॉस्टॅल्जिया -श्रीनिवास बेलसरे काळ होता ६०च्या दशकातला म्हणजे आजपासून सुमारे ६५ वर्षांपूर्वीचा! भौतिक प्रगती

अधिक मास : आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पर्व

स्मृतीगंध-लता गुठे आजही ग्रामीण भागामध्ये ‘अधिक मासा’ला विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण,