मुंबई गोवा महामार्गावर अपघात, ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू 

  99

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची धडक बसल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेला तरुण महाड औद्योगिक वसाहतीत नोकरी करत होता. वैभव रमेश पालकर असे या तरुणाचे नाव होते. तो पोलादपूरच्या आनंदनगरचा रहिवासी होता.


वैभव पालकर रात्रपाळीची नोकरी करुन लिफ्ट मागून मोटारसायकलवरुन घरी परतत होता, त्यावेळी अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. अपघात झाल्याचे कळताच जवळच्या लोहारे गावातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनीच वैभवचा मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. यानंतर वैभवच्या नातलगांना माहिती देण्यात आली.


महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ने-आण करण्यासाठी एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनीही कामगारांच्या प्रवासाकरिता सुरक्षित अशी व्यवस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केलेले नाही. यामुळे अनेकजण मिळेल त्या वाहनातून प्रवास करतात. नोकरीचे ठिकाण ते घर असा प्रवास करताना कधी अपघात झाला तर काही वेळा कामगारांच्या जीवावर बेतते तर काही वेळा ते जखमी होतात.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी