मुंबई गोवा महामार्गावर अपघात, ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू 

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची धडक बसल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेला तरुण महाड औद्योगिक वसाहतीत नोकरी करत होता. वैभव रमेश पालकर असे या तरुणाचे नाव होते. तो पोलादपूरच्या आनंदनगरचा रहिवासी होता.


वैभव पालकर रात्रपाळीची नोकरी करुन लिफ्ट मागून मोटारसायकलवरुन घरी परतत होता, त्यावेळी अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. अपघात झाल्याचे कळताच जवळच्या लोहारे गावातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनीच वैभवचा मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. यानंतर वैभवच्या नातलगांना माहिती देण्यात आली.


महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ने-आण करण्यासाठी एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनीही कामगारांच्या प्रवासाकरिता सुरक्षित अशी व्यवस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केलेले नाही. यामुळे अनेकजण मिळेल त्या वाहनातून प्रवास करतात. नोकरीचे ठिकाण ते घर असा प्रवास करताना कधी अपघात झाला तर काही वेळा कामगारांच्या जीवावर बेतते तर काही वेळा ते जखमी होतात.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात