मुंबई गोवा महामार्गावर अपघात, ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू 

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची धडक बसल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेला तरुण महाड औद्योगिक वसाहतीत नोकरी करत होता. वैभव रमेश पालकर असे या तरुणाचे नाव होते. तो पोलादपूरच्या आनंदनगरचा रहिवासी होता.


वैभव पालकर रात्रपाळीची नोकरी करुन लिफ्ट मागून मोटारसायकलवरुन घरी परतत होता, त्यावेळी अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. अपघात झाल्याचे कळताच जवळच्या लोहारे गावातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनीच वैभवचा मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. यानंतर वैभवच्या नातलगांना माहिती देण्यात आली.


महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ने-आण करण्यासाठी एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनीही कामगारांच्या प्रवासाकरिता सुरक्षित अशी व्यवस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केलेले नाही. यामुळे अनेकजण मिळेल त्या वाहनातून प्रवास करतात. नोकरीचे ठिकाण ते घर असा प्रवास करताना कधी अपघात झाला तर काही वेळा कामगारांच्या जीवावर बेतते तर काही वेळा ते जखमी होतात.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका