Sindhudurg News : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला!

सिंधुदुर्ग : शिवप्रेमींसाठी आनंदवार्ता समोर आली आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ११ मे रोजी होणार आहे.


४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिनानिमित्ताने मालवण राजकोट किल्ला याठिकाणी किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा दुर्घटना घडली होती. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने पुनर्बांधणी करण्यात आली. मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि., गाझिपूर, उत्तर प्रदेश यांच्यामार्गदर्शनाखाली नव्याने पुतळा उभारण्यात आला आहे.



हा शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा , शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची आहे. त्यामुळे शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा बनविण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी कांस्य धातूच्या ८ मिलीमीटर जाडीच्या पत्र्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. यासाठी वापरण्यात येणारे स्टिल हे स्टेनलेस स्टिल आहे.



पुतळ्यासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या पुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी करण्यात येणार होते परंतु काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आले. आता या पुतळ्याचे लोकार्पण ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२:३० ते १:३० दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

वसंत पंचमी २०२६ : ज्ञान, कला आणि नव्या सुरुवातीचा शुभ दिवस; जाणून घ्या सरस्वती पूजनाची परंपरा आणि महत्त्व

मुंबई : माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरी होणारी वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील विशेष मानाचा दिवस मानला जातो.

मध्य रेल्वेद्वारा मुंबई–नागपूर / मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे सेवा

मुंबई  : रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करता, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई –

तंत्रज्ञानाच्या जोरावर चार राज्यांत शोधमोहीम; ४ राज्ये , ३० टोलनाके, ३०० सीसीटीव्ही पालथे घालत वर्धा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

वर्धा : जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या १० चाकी ट्रकचा शोध घेण्यासाठी वर्धा पोलिसांनी केलेली तपासमोहीम सध्या

बार्ट्रॉनिक्स लिमिटेड एस एन एन कंपनीचे अधिग्रहण करणार

मोहित सोमण: बार्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bartronics Limited) कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये एसएनएन (Shree Naga Narasimha Private Limited SNN) कंपनीचे

कल्याण–डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण :कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील

शिवसेनेसोबत मनसेने जाणे मला पटले नाही

ठाणे :कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणात शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिल्यामुळे उबाठातून मोठी खळबळ