HBL Bank: सीमा क्षेत्रातील बँका आणि एटीएम बंद, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय!

जम्मू आणि काश्मीर: पाकिस्तानी बँक एलओसीच्या जवळील आपल्या शाखा बंद करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी बँक हबीब बँक लिमिटेडने (HBL Bank) नियंत्रण सीमा रेषेनजीक असलेल्या सर्व शाखा बंद केल्या आहेत. यामागील कारण सीमेवरील तणाव असल्याचे सांगितले जाते.


पाकव्याप्त काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील रक्कड धार बाजारची शाखा कालपासून अचानक बंद करण्यात आली, आणि त्याबाहेर "सीमा क्षेत्रातील सुरक्षा समस्यांमुळे बँका आणि एटीएम बंद आहेत" अशी सूचना लावण्यात आली. स्थानिकांचा असा दावा आहे की, हाजिरा, खाई गाला आणि तराखलच्या शाखा कधीही बंद होऊ शकतात. याला कारणीभूत पाकिस्तान सैन्याकडून सीमारेषेवर केला जात असलेला गोळीबार असल्याचे सांगितले जात आहे.



पाकिस्तान सैन्याकडून सीमारेषेवर गोळीबार


गेल्या आठवड्यात पाकिस्तानी सैन्याने १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, ज्यामध्ये कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरचा देखील समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध उचललेल्या कठोर कारवाईमध्ये, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भारतीय लष्कराच्या तिन्ही गटांना फ्री हॅन्ड दिला आहे. यामुळे भारत कधीही युद्ध करू शकते अशी भीती पाकिस्तानला आहे. या भीतीपोटी पाकिस्तान सीमा रेषेवर गोळीबार करत आहे. ज्याला भारतीय सैन्याकडून देखील प्रत्युत्तर मिळत आहे.


 
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे