HBL Bank: सीमा क्षेत्रातील बँका आणि एटीएम बंद, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय!

  49

जम्मू आणि काश्मीर: पाकिस्तानी बँक एलओसीच्या जवळील आपल्या शाखा बंद करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी बँक हबीब बँक लिमिटेडने (HBL Bank) नियंत्रण सीमा रेषेनजीक असलेल्या सर्व शाखा बंद केल्या आहेत. यामागील कारण सीमेवरील तणाव असल्याचे सांगितले जाते.


पाकव्याप्त काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील रक्कड धार बाजारची शाखा कालपासून अचानक बंद करण्यात आली, आणि त्याबाहेर "सीमा क्षेत्रातील सुरक्षा समस्यांमुळे बँका आणि एटीएम बंद आहेत" अशी सूचना लावण्यात आली. स्थानिकांचा असा दावा आहे की, हाजिरा, खाई गाला आणि तराखलच्या शाखा कधीही बंद होऊ शकतात. याला कारणीभूत पाकिस्तान सैन्याकडून सीमारेषेवर केला जात असलेला गोळीबार असल्याचे सांगितले जात आहे.



पाकिस्तान सैन्याकडून सीमारेषेवर गोळीबार


गेल्या आठवड्यात पाकिस्तानी सैन्याने १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, ज्यामध्ये कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरचा देखील समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध उचललेल्या कठोर कारवाईमध्ये, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भारतीय लष्कराच्या तिन्ही गटांना फ्री हॅन्ड दिला आहे. यामुळे भारत कधीही युद्ध करू शकते अशी भीती पाकिस्तानला आहे. या भीतीपोटी पाकिस्तान सीमा रेषेवर गोळीबार करत आहे. ज्याला भारतीय सैन्याकडून देखील प्रत्युत्तर मिळत आहे.


 
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या