घाटकोपर दुर्घटना विसरलात का? वर्ष झाले, तरीही जाहिरात धोरण अधांतरीच! बीएमसीच्या आश्वासनाचं काय झालं?

फलक माफियांचा दबाव आणि महसूल वाटपावरूनही वाद


मुंबई : घाटकोपरमधील भलीमोठी फलक दुर्घटना होऊन १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याला तब्बल एक वर्ष उलटलं, पण मुंबई महानगरपालिकेचं जाहिरात धोरण अद्याप तयार झालेलं नाही. लोकांचा संयम सुटतोय, मुंबईकरांचा रोष वाढतोय, पण पालिकेच्या हालचाली धीम्याच आहेत.


२०२४ साली १३ मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर कोसळलेल्या बेकायदेशीर फलकामुळे घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बीएमसीने बाह्य जाहिरातींसाठी नवीन धोरण तयार करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आज वर्षभरानंतरही त्या धोरणाचं अर्धंच चित्र स्पष्ट आहे. गेल्या ऑगस्टमध्ये मसुदा जाहीर झाला, पण नागरिकांच्या सूचना व हरकती घेतल्यानंतर तब्बल तीन महिने काहीच हालचाल नाही, अशी तक्रार येथील कार्यकर्त्यांनी केली आहे.


बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. हा अहवाल अंतिम धोरणात समाविष्ट करण्याची योजना आहे. मात्र एका अधिकाऱ्याने सांगितलं, "आता किती दिवस वाट पाहायची? आम्ही धोरण पुढे नेणारच आहोत."



पालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी सांगितलं की, "फलक धोरण लवकरच प्रसिद्ध केलं जाईल."


मिळालेल्या माहितीनुसार, भोसले समितीला नुकतीच एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मूळतः हा अहवाल ६ महिन्यांत द्यायचा होता, पण संदर्भ निश्चित होण्यात विलंब झाल्याने उशीर झाला.


माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआयद्वारे या धोरणाच्या स्थितीबाबत माहिती मागवली होती, पण पालिकेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. ते म्हणाले, "नागरिकांनी मनापासून सूचना दिल्या, पण पालिकेने माहिती द्यावीशीही वाटली नाही. फलक माफियांचा दबाव असल्याची शंका आहे. विविध सरकारी संस्था आणि बीएमसी यांच्यात महसुली वाटपावरूनही वाद सुरू आहे. पुन्हा घाटकोपरसारखी दुर्घटना होऊ नये यासाठी तातडीने धोरण आणणं आवश्यक आहे."


दरम्यान, या सुनावणीत महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC) यांच्यासह काही संस्थांनी, त्यांच्या रस्ते व उड्डाणपूलांवरील जाहिरातींच्या उत्पन्नातून बीएमसीला ५० टक्के महसूल वाटपाच्या अटींना विरोध दर्शवला आहे. पालिकेकडून काही सवलतींचा विचार सुरू असून, बीएमसी शहरातील इतर संस्थांवर ‘मोठा भाऊ’ म्हणून आपली भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण