BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार? प्रशासनाची हालचाल सुरू, BMC युद्धाच्या तयारीत!

मुंबई : लोकसभा संपली, विधानसभाही पार पडली… आता देशातील लक्ष वेधणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची चाहूल लागली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून बीएलओ नियुक्त्या सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ‘मुंबई महापालिका निवडणूक लवकरच’ या शक्यतेला राजकीय वर्तुळात बळ मिळाले आहे.


६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी याचिकांवर सुनावणी होणार आहे. हाच दिवस निवडणुकांचा संभाव्य रोडमॅप स्पष्ट करणारा ठरू शकतो. पण त्याआधीच प्रशासनाने बीएलओ कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. काही कर्मचाऱ्यांना तर "नाही रुजलात तर कायदेशीर कारवाई" असा इशारा देण्यात आला आहे.



कोरोनाकाळानंतर मुंबई महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. पण निवडणूक तयारीच्या नावाखाली सुरू झालेली बीएलओ नियुक्ती ही निवडणूक रणसंग्रामाची पहिली घंटा मानली जात आहे.



BLO म्हणजे कोण?


मतदान केंद्रांच्या यादीतील नावांची शुद्धता, नविन मतदारांची नोंदणी, अनधिकृत नावे वगळणे ही जबाबदारी BLO म्हणजे Booth Level Officer पार पाडतात. एका BLOकडे दोन केंद्रांची जबाबदारी असते, आणि ही नियुक्ती निवडणुकीच्या यंत्रणेतील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असते.


दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मात्र "ही तयारी म्हणजे निवडणूक निश्चित असल्याचे संकेत नाहीत," असे म्हणत अधिकृत खुलासा टाळला. मात्र, राजकीय गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा