Eknath Shinde : काँग्रेसने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही; यामुळेच लाखो सैनिक शहीद झाले!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात


मुंबई : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला असून 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दिला आहे. या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांसह अभिनेत्यांनी देखील प्रतिक्रीया मांडल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनीही पहलगाम हल्ल्याबाबत वक्तव्य करत असताना काँग्रेसवर घणाघात केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन केली जात आहे. मात्र, काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Eknath Shinde On Pahalgam Attack)



पहलगाम हल्ल्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानविरुद्ध सर्वात कठोर कारवाई केली. अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन दिली. उच्चायुक्तालयातून ५ जणांना काढून टाकले. सिंधू जल करार स्थगित केला. अटारी सीमा बंद केली. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले, असे कधी घडले आहे का? पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक कोणी केले? यावेळीही पाकिस्तानला योग्य उत्तर मिळेल.' सकाळी तिन्ही सैन्याच्या पथकांमध्ये बैठक झाली आणि त्यात कठोर निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट करून हिशोब चुकता करतील.' असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


त्याचबरोबर, काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची किंवा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. काँग्रेसने फक्त व्होट बँकचे राजकारण केले आहे. यामुळेच लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Comments
Add Comment

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी