Eknath Shinde : काँग्रेसने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही; यामुळेच लाखो सैनिक शहीद झाले!

  110

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात


मुंबई : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला असून 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दिला आहे. या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांसह अभिनेत्यांनी देखील प्रतिक्रीया मांडल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनीही पहलगाम हल्ल्याबाबत वक्तव्य करत असताना काँग्रेसवर घणाघात केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन केली जात आहे. मात्र, काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Eknath Shinde On Pahalgam Attack)



पहलगाम हल्ल्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानविरुद्ध सर्वात कठोर कारवाई केली. अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन दिली. उच्चायुक्तालयातून ५ जणांना काढून टाकले. सिंधू जल करार स्थगित केला. अटारी सीमा बंद केली. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले, असे कधी घडले आहे का? पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक कोणी केले? यावेळीही पाकिस्तानला योग्य उत्तर मिळेल.' सकाळी तिन्ही सैन्याच्या पथकांमध्ये बैठक झाली आणि त्यात कठोर निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट करून हिशोब चुकता करतील.' असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


त्याचबरोबर, काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची किंवा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. काँग्रेसने फक्त व्होट बँकचे राजकारण केले आहे. यामुळेच लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही