येत्या पाच वर्षांत म्हाडा बांधणार आठ लाख घरे

म्हाडाच्या घरांमध्ये १ लाख १ हजार ७४३ कोटी गुंतवणूक


मुंबई (प्रतिनिधी): मुंबई मेट्रो रिजनमध्ये (एमएमआर) २ लाख ४९ घरे मंजूर आहेत, त्यामध्ये पुढील पाच वर्षांत ५ लाख ३२ हजार ६५२ घरे बनवण्यात येतील. यामध्ये मुंबई बोर्ड, दुरुस्ती बोर्ड व कोकण बोर्डाचा समावेश आहे. मुंबई व एमएमआरडीए रिजनसाठी ग्रोथ हब व गृहनिर्माण धोरण बावत म्हाडाने सुचवलेल्या शिफारशींची यावेळी जयस्वाल मांनी माहिती दिली. पुढील पाच वर्षांत म्हाडाच्या घरांमध्ये १ लाख १ हजार ७४३ कोटी गुंतवणूक होणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल म्हणाले. सोमवारी म्हाडाने आयोजित केलेल्या पुनर्विकास परिषद व गुंतवणूकदार मीटमध्ये ते बोलत होते.


पुनर्विकासासाठी तब्बल ३०, ३५ वर्षे लागणे अत्यंत चुकीचे आहे. पुनर्विकासाची कामे तातडीने व प्राधान्याने करावीत, तुम्हाला दुआ मिळेल, असा सल्ला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विकासकांना दिला. ३०, ३५ वर्षे पुनर्विकासासाठी लावू नका, अशी प्रकरणे पुढे आल्यानंतर आपल्याला गुन्हेगार असल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले. यावेळी एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, नितेंद्र मेहता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सीईओ मिलींद बोरीकर, दुरुस्ती मंडळाचे मिलींद शंभरकर, माजी सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी, ज्येष्ठ विकासक निरंजन हिरानंदानी, धवल अजमेरा, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल नरेडकोचे बोमन इराणी व मोठ्या संख्येने विकासक, गुंतवणूदार उपस्थित होते.


मोतीलाल नगर गोरेगाव, वांद्रे रेक्लेमेशन, अभ्युदय नगर काळाचौकी, पोलीस हाऊसिंग, आदर्श नगर वरळी, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, सिद्धार्थनगर अशा ठिकाणी गुंतवणुकदार म्हाडाच्या मार्फत पुनर्विकास केला जाईल, रेरेंटल हाऊसिंगसाठी म्हाडाने आता पुढाकार घेतला आहे. भाडेतत्त्वावरील घरांमधून मिळणाऱ्या भाड्याचे उत्पन्न पुढील दहा वर्षांसाठी आयकर मुक्त असेल, अशी शिफारस करण्यात आली आहे. कर्जावरील व्याज दरात कपात, बाय बैंक धोरण अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या भाढतत्त्वावरील घरांसाठी म्हाडा नोडल एजन्सी म्हणून काम करेल, मुंबई साठी अतिरिक्त ०.५ एफएसआय व एमएमआर रिजनसाठी ०.३ एफएसआय देण्यात मेईल. रेटलसाठी प्रीमियम माफ केला जाईल, डेव्हलपमेंट चार्च ५० टक्के माफ केला जाईल, प्रॉपर्टी टॅक्स ५०% केला जाईल, अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. निरंजन हिरानंदानी म्हणाले, मुंबई, महाराष्ट्रातील उद्योग रेंटल हाऊसिंग नसल्याने बंगळूरु हैदराबादला जात आहेत हा रेंटल हाऊसिंग नसल्याचा परिणाम असल्याचे मत त्यांनी मांडले. रेंटल हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर जास्त भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Comments
Add Comment

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

महापालिकेच्या प्रत्येक तक्रारींचे आता त्वरीत निवारण...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची तक्रार केल्यानंतर त्याला प्रतिसाद

मराठा आरक्षणाचा पेच उच्च न्यायालयात! ओबीसी कोट्यातील अध्यादेशावर आता कोर्टाची नजर

मुंबई: मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातून आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई  खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी