येत्या पाच वर्षांत म्हाडा बांधणार आठ लाख घरे

म्हाडाच्या घरांमध्ये १ लाख १ हजार ७४३ कोटी गुंतवणूक


मुंबई (प्रतिनिधी): मुंबई मेट्रो रिजनमध्ये (एमएमआर) २ लाख ४९ घरे मंजूर आहेत, त्यामध्ये पुढील पाच वर्षांत ५ लाख ३२ हजार ६५२ घरे बनवण्यात येतील. यामध्ये मुंबई बोर्ड, दुरुस्ती बोर्ड व कोकण बोर्डाचा समावेश आहे. मुंबई व एमएमआरडीए रिजनसाठी ग्रोथ हब व गृहनिर्माण धोरण बावत म्हाडाने सुचवलेल्या शिफारशींची यावेळी जयस्वाल मांनी माहिती दिली. पुढील पाच वर्षांत म्हाडाच्या घरांमध्ये १ लाख १ हजार ७४३ कोटी गुंतवणूक होणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल म्हणाले. सोमवारी म्हाडाने आयोजित केलेल्या पुनर्विकास परिषद व गुंतवणूकदार मीटमध्ये ते बोलत होते.


पुनर्विकासासाठी तब्बल ३०, ३५ वर्षे लागणे अत्यंत चुकीचे आहे. पुनर्विकासाची कामे तातडीने व प्राधान्याने करावीत, तुम्हाला दुआ मिळेल, असा सल्ला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विकासकांना दिला. ३०, ३५ वर्षे पुनर्विकासासाठी लावू नका, अशी प्रकरणे पुढे आल्यानंतर आपल्याला गुन्हेगार असल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले. यावेळी एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, नितेंद्र मेहता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सीईओ मिलींद बोरीकर, दुरुस्ती मंडळाचे मिलींद शंभरकर, माजी सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी, ज्येष्ठ विकासक निरंजन हिरानंदानी, धवल अजमेरा, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल नरेडकोचे बोमन इराणी व मोठ्या संख्येने विकासक, गुंतवणूदार उपस्थित होते.


मोतीलाल नगर गोरेगाव, वांद्रे रेक्लेमेशन, अभ्युदय नगर काळाचौकी, पोलीस हाऊसिंग, आदर्श नगर वरळी, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, सिद्धार्थनगर अशा ठिकाणी गुंतवणुकदार म्हाडाच्या मार्फत पुनर्विकास केला जाईल, रेरेंटल हाऊसिंगसाठी म्हाडाने आता पुढाकार घेतला आहे. भाडेतत्त्वावरील घरांमधून मिळणाऱ्या भाड्याचे उत्पन्न पुढील दहा वर्षांसाठी आयकर मुक्त असेल, अशी शिफारस करण्यात आली आहे. कर्जावरील व्याज दरात कपात, बाय बैंक धोरण अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या भाढतत्त्वावरील घरांसाठी म्हाडा नोडल एजन्सी म्हणून काम करेल, मुंबई साठी अतिरिक्त ०.५ एफएसआय व एमएमआर रिजनसाठी ०.३ एफएसआय देण्यात मेईल. रेटलसाठी प्रीमियम माफ केला जाईल, डेव्हलपमेंट चार्च ५० टक्के माफ केला जाईल, प्रॉपर्टी टॅक्स ५०% केला जाईल, अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. निरंजन हिरानंदानी म्हणाले, मुंबई, महाराष्ट्रातील उद्योग रेंटल हाऊसिंग नसल्याने बंगळूरु हैदराबादला जात आहेत हा रेंटल हाऊसिंग नसल्याचा परिणाम असल्याचे मत त्यांनी मांडले. रेंटल हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर जास्त भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Comments
Add Comment

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' मुंबई: शिवसेना

मुंबईकरांच्या सेवेत १५० नवीन इलेक्ट्रिक बेस्ट बस सज्ज!२१ मार्गावर दररोज १.९ लाख प्रवाशांना लाभ

मुंबई: मुंबईतील परिवहन सेवा आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्य

Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या विकासाला गती; FDI साठी विशेष अधिकारी पद, जात प्रमाणपत्र, रेल्वे निधी... कॅबिनेटचे ७ मोठे धमाके!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८ ऑक्टोबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप