दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल, संयुक्त राष्ट्रांमध्ये घेतली हजेरी

संयुक्त राष्ट्रे : अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम करत आहोत. ही एक चूक होती आणि त्याचे आम्हाला दुःख होत आहे; असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत सांगितले. पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वतःच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली.



संयुक्त राष्ट्रांमध्ये या मुलाखतीचा संदर्भ देत भारताच्या उप स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तानची हजेरी घेतली. पाकिस्तानने स्वतःच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली आहे. यात आता आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. पण पाकिस्तानने अखेर स्वतः कबुली दिली आहे आणि याची जगाने दखल घ्यायलाच हवी. पाकिस्तानच दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे. पाकिस्तानमुळेच दहशतवाद पसरत आहे. प्रदेशातील वातावरण अशांत आणि अस्थिर झाले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसमोर जग डोळे बंद करुन राहू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.



पहलगाम अतिरेकी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नाव आणि धर्म विचारुन २५ हिंदू पर्यटकांना ठार करण्यात आले. पर्यटकांसोबत असलेल्या एका स्थानिकालाही मारण्यात आले. अतिरेक्यांनी आधुनिक शस्त्रांद्वारे २६ नागरिकांची हत्या केली. या घटनेनंतर लष्कर - ए - तोयबा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी घेतली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी एका मुलाखतीत बोलताना दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली.
Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर