दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल, संयुक्त राष्ट्रांमध्ये घेतली हजेरी

  59

संयुक्त राष्ट्रे : अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम करत आहोत. ही एक चूक होती आणि त्याचे आम्हाला दुःख होत आहे; असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत सांगितले. पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वतःच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली.



संयुक्त राष्ट्रांमध्ये या मुलाखतीचा संदर्भ देत भारताच्या उप स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तानची हजेरी घेतली. पाकिस्तानने स्वतःच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली आहे. यात आता आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. पण पाकिस्तानने अखेर स्वतः कबुली दिली आहे आणि याची जगाने दखल घ्यायलाच हवी. पाकिस्तानच दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे. पाकिस्तानमुळेच दहशतवाद पसरत आहे. प्रदेशातील वातावरण अशांत आणि अस्थिर झाले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसमोर जग डोळे बंद करुन राहू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.



पहलगाम अतिरेकी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नाव आणि धर्म विचारुन २५ हिंदू पर्यटकांना ठार करण्यात आले. पर्यटकांसोबत असलेल्या एका स्थानिकालाही मारण्यात आले. अतिरेक्यांनी आधुनिक शस्त्रांद्वारे २६ नागरिकांची हत्या केली. या घटनेनंतर लष्कर - ए - तोयबा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी घेतली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी एका मुलाखतीत बोलताना दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली.
Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या