मुंबईतून कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर

  50

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक प्रकल्पाचे काम ७० ते ९० टक्के झाले आहे. येत्या काळात लवकरच हे प्रकल्प नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण हा मेट्रो मार्गदेखील लवकरच सेवेत येणार आहे. या मेट्रोमार्गाचे काम ठाणे ते धामणकर नाक्यापर्यंत झाले आहे. मात्र धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान मेट्रोच्या कामात अनेक अडचणी आहेत. लवकरच या मेट्रो मार्गाचा एक टप्पा भुयारी असणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो लाइन ५ प्रकल्पाचे ८० टक्के झाले आहे.


हा मेट्रो मार्ग झाल्यावर लोकलवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. मेट्रो लाइन ५ चा मार्ग २४.९० किमी लांबीचा एलिवेटेड कॉरिडोर आहे. या मार्गिकवर १५ मेट्रो स्थानके आहेत. मेट्रो मार्गिका ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत ही मेट्रो सेवेत येणार आहे.धामणकर नाका ते दुर्गाडी मेट्रोचा मार्ग हा भुयारी असेल ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचे काम ठाणे ते धामणकर नाका दरम्यान मार्गी लागले आहे.


धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान भुयारी मार्ग केला जाणार आहे. भिवंडीकरांना मुंबईत येण्यासाठी एक ठाण्यामार्गे लोकलपकडून यावे लागते किंवा रस्ते मार्गे, भिवंडीतून ठाण्याला येण्यासाठीही रिक्षा किंवा बसने यावे लागते. पण या मेट्रोमुळं मुंबईकरांना थेट शहरात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ५० ते ७५ टक्के वेळ कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ५४१६.५१ इतका खर्च येण्याची शक्यता आहे.



अशी असतील स्थानके


१. बाळकुम नाका, २. कशेली, ३. काल्हेर, ४. पूर्णा, ५. अजुरफाटा, ६. धामणकर नाका, ७. भिवंडी, ८. गोपाळ नगर, ९. टेमघर, १०. रजनोली, ११. गोव गाय, १२ कोन गाव, १३. लाल चौकी, १४. कल्याण स्टेशन, १५. कल्याण एपीएमसी.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील