मुंबईतून कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक प्रकल्पाचे काम ७० ते ९० टक्के झाले आहे. येत्या काळात लवकरच हे प्रकल्प नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण हा मेट्रो मार्गदेखील लवकरच सेवेत येणार आहे. या मेट्रोमार्गाचे काम ठाणे ते धामणकर नाक्यापर्यंत झाले आहे. मात्र धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान मेट्रोच्या कामात अनेक अडचणी आहेत. लवकरच या मेट्रो मार्गाचा एक टप्पा भुयारी असणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो लाइन ५ प्रकल्पाचे ८० टक्के झाले आहे.


हा मेट्रो मार्ग झाल्यावर लोकलवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. मेट्रो लाइन ५ चा मार्ग २४.९० किमी लांबीचा एलिवेटेड कॉरिडोर आहे. या मार्गिकवर १५ मेट्रो स्थानके आहेत. मेट्रो मार्गिका ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत ही मेट्रो सेवेत येणार आहे.धामणकर नाका ते दुर्गाडी मेट्रोचा मार्ग हा भुयारी असेल ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचे काम ठाणे ते धामणकर नाका दरम्यान मार्गी लागले आहे.


धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान भुयारी मार्ग केला जाणार आहे. भिवंडीकरांना मुंबईत येण्यासाठी एक ठाण्यामार्गे लोकलपकडून यावे लागते किंवा रस्ते मार्गे, भिवंडीतून ठाण्याला येण्यासाठीही रिक्षा किंवा बसने यावे लागते. पण या मेट्रोमुळं मुंबईकरांना थेट शहरात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ५० ते ७५ टक्के वेळ कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ५४१६.५१ इतका खर्च येण्याची शक्यता आहे.



अशी असतील स्थानके


१. बाळकुम नाका, २. कशेली, ३. काल्हेर, ४. पूर्णा, ५. अजुरफाटा, ६. धामणकर नाका, ७. भिवंडी, ८. गोपाळ नगर, ९. टेमघर, १०. रजनोली, ११. गोव गाय, १२ कोन गाव, १३. लाल चौकी, १४. कल्याण स्टेशन, १५. कल्याण एपीएमसी.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी