एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार!

पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा!


मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत येथील सर्व रहिवाशांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.


या बैठकीत मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी स्थानिक रहिवाशांचा आवाज बुलंद करत मुद्दा लावून धरला. कालिदास कोळबंकर यांच्या सूचनेवर आधारित शिफारशीही समोर आल्या. मुळात, एल्फिन्स्टन पुलाच्या कामामुळे आधी १९ इमारतींना धोका होता; आता नव्या नियोजनामुळे केवळ २ इमारतींवर परिणाम होणार आहे. पण स्थानिक नागरिकांची भीती होती की "पुलाचे काम सुरू झाल्यावर अन्य १७ इमारतींनाही धोका निर्माण होईल!"



म्हणून भाजपा आमदार कालिदास कोळबंकर आणि अॅड. आशिष शेलार यांनी ठाम भूमिका घेत आक्रमकपणे मागणी केली की, "गिरणगावातील मराठी माणसाला उखडून फेकायला आम्ही देणार नाही. सगळ्या १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीएनेच ताबडतोब करावा! कोणत्याही विकासकाची वाट पाहायची गरज नाही!"


मुख्यमंत्र्यांनीही हा आग्रह मान्य केला. त्यानुसार, संपूर्ण पुनर्विकासाच्या योजनेत, बाधित २ इमारतींतील रहिवाशांना कुर्ला येथे तात्पुरती घरे देण्यात येणार आहेत. आणि मग त्यांनाही आपल्या मूळ जागीच नव्या घरात वसवलं जाणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे गिरणगावातील नागरिकांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात