नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळायचं... हेच तुमचं राजकारण का? फडणवीसांनी वडेट्टीवारांना फटकारले!

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६ जणांचा समावेश आहे. देश हळहळतोय, संतापतोय... आणि इथे काही नेते त्या जखमांवर राजकारणाचे मीठ चोळायला मोकळे झालेत! देशभरात संतापाचा भडका उडला आहे. तरीही महाराष्ट्रात काही नेते या दु:खावर राजकारण करत आहेत. याला काय म्हणायचे? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे.


काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बेजबाबदार वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट घणाघात केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, "दहशतवाद्यांना कुठे धर्म विचारायला वेळ असतो?" हे म्हणजे ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या नातेवाईकांच्या व्यथेवरही अविश्वास? कुठे चाललेय राजकारण?



यावर फडणवीस संतापून म्हणाले, "तिथे वडेट्टीवार नव्हते! मग नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळून मुंबईत कमेंट करण्याचा अधिकार यांना कुठून येतो? प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं सत्य आणि नातेवाईकांचं थेट सांगणं यालाही हे नेते नाकारतात! तर हे फक्त मूर्खपणाच नाही, तर ही क्रूर असंवेदनशीलता आहे!"


मुख्यमंत्र्यांनी थेट सवाल केला आहे की, "ज्यांनी जिवंतपणी हत्येचा थरकाप अनुभवला, त्यांच्या सांगण्याला खोटं ठरवणं, हे माणुसकीला शोभतं का? ज्यांनी जवळच्यांचा मृत्यू पाहिला, त्यांचं दुःख खोटं ठरवणं, याहून मोठं पाप दुसरं कोणतं?"


देशावर झालेल्या हल्ल्याला कमी लेखणं, आणि मरणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या भावनांना तुडवणं, हे असंवेदनशीलतेचं नव्हे तर राष्ट्रद्रोहाच्या सीमेला छेद देणारं आहे. देशावर आघात करणाऱ्या घटनेवर राजकीय टीका करताना संवेदनशीलतेचा बळी दिला जातोय का, हे विचार करायची वेळ आली आहे!

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा