Mohan Bhagwat: "आम्ही शेजाऱ्यांना इजा करत नाही, पण जर ते वाईट मार्गाकडे वळले तर..." जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

मुंबई: अहिंसा हा भारताचा धर्म आहे, हिंदू धर्माचे ते मुख्य तत्व आहे, यावर भर देत संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी "भारत कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा इजा करत नाही, परंतु जर वाईट कृत्य वाढले तर बचावात प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. असे जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शनिवारी वक्तव्य केले. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्येक स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी देखील या हल्ल्याविरुद्ध जोरदार निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या द हिंदू मेनिफेस्टो नामक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित करताना हे वक्तव्य केले.



काय म्हंटले मोहन भागवत?


अहिंसा हे हिंदू धर्माचे मुख्य तत्व आहे, मात्र आक्रमकांना तोंड देणे आणि विजय मिळवणे हा देखील धर्माचा एक भाग आहे.  रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता, असं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं.


"आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा त्यांना इजा पोहोचवत नाही. पण जर कोणी वाईटाकडे वळले तर दुसरा पर्याय काय आहे? प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे, आणि त्याने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे," असं देखील भागवत पुढे म्हणाले.


भागवत यांनी आपल्या भाषणात चार तत्वांवर भर दिला आहे, ते म्हणाले "सनातन धर्माची खरी समज सध्याच्या काळात महत्त्वाची आहे. हिंदू धर्म सत्य, सुचितता, करुणा आणि तपस्या या चार स्तंभांवर उभा राहिला पाहिजे. याच्या पलीकडे जाणारी प्रत्येक गोष्ट अधर्म आहे,"



हिंदू शांत बसणाऱ्यातले नाही


दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नमूद केले की हल्लेखोरांनी लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हे आपले स्वरूप नाही. द्वेष आणि शत्रुत्व आपल्या संस्कृतीचा भाग नाही. पण शांतपणे हानी सहन करणेही आपला स्वभाव नाही.


पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंटने या दहशतवादी हल्ल्याचा दावा केला आहे आणि अलिकडच्या काळातल्या सर्वात प्राणघातक घटनांपैकी एक म्हणून या हल्ल्याचे वर्णन केले जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!

पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार नेसा 'या' शुभ रंगांची साडी

मुंबई : विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही तासांवर

Vat Purnima 2026: यंदाची वटपौर्णिमा ठरणार खास; सोमवारी दुर्मिळ शुभ संयोग, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

यंदा वटपौर्णिमा (Vat Purnima 2026) २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार असून या वर्षीचा सण धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे.

Soccer Ball : फुटबॉल इतिहासातील ५ अजरामर बॉल; ज्यांनी बदलली खेळाची दिशा!

फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूंचे कौशल्य जितके महत्त्वाचे असते, तितकेच महत्त्वाचे असते तो 'बॉल'. तंत्रज्ञान आणि