महाराष्ट्र वाघांसाठी 'यमलोक', राज्यात चार महिन्यांत २० वाघांचा मृत्यू

नागपूर : महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत वाढ होत असताना वाघांच्या मृत्यूमध्येही वाढ झाली आहे. महाराष्ट्र वाघांसाठी 'यमलोक' झाल्याची चर्चा यामुळेच सुरू झाली आहे. भारतात मागील चार महिन्यांत ६२ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी २० वाघांचा मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाला आहे. वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र सध्या देशात पहिल्या स्थानावर आहे. मागील चार महिन्यांत मध्य प्रदेशात १७ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत मध्य प्रदेश हा महाराष्ट्राच्या खालोलाख दुसऱ्या स्थानावर आहे.



भारतात २०२२ मध्ये वाघांची मोजणी अर्थात व्याघ्रगणना झाली. या व्याघ्रगणनेनुसार भारतात तीन हजार १६७ वाघांची नोंद झाली. राज्यात २०१८ मध्ये ३१२ वाघांची नोंद झाली होती. यानंतर २०२२ च्या व्याघ्रगणनेत महाराष्ट्रात ४४४ वाघांची नोंद झाली. व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात व्याघ्र मृत्यूची संख्याही वाढली आहे.



राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी २०२५ पासून २६ एप्रिलपर्यंतच्या चार महिन्यांत ६२ व्याघ्रमृत्यू झालेले आहेत. यापैकी महाराष्ट्रात २० आणि मध्य प्रदेशात १७ व्याघ्रमृत्यू झाले आहेत. हे मृत्यू प्रामुख्याने वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार अथवा नैसर्गिक कारणामुळे झाले आहेत.

महाराष्ट्रात मागील पाच वर्षात ४१ वाघ आणि ५५ बिबट्यांची शिकार झाली आहे. ही आकडेवारी जानेवारी २०२५ पर्यंतची आहे. मागील पाच पाच वर्षात शिकाऱ्यांनी देशभरात बेकायदेशिररित्या १०० पेक्षा जास्त वाघांची शिकार केली आहे. यातील काही प्रकरणांचा तपास सुरू आहे तर काही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे. आता ऑक्टोबर २०२५ मध्ये नव्या व्याघ्रगणनेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत घोषणा झालेली नाही. पण तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या