कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन कुणाल कामरा याची मुंबई पोलीस चौकशी करू शकतात. पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत कुणालला अटकेपासून संरक्षण देण्यात येत आहे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्देशांमुळे कुणाल कामरावरील अटकेची टांगती तलवार सध्या दूर झाल्याचे चित्र आहे. न्यायालयाकडून कुणाल कामराला हा दिलासा मिळाला आहे.



स्टँड-अप कॉमेडी शो करताना कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी खार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आली आहे. ही एफआयआर रद्द करण्याची कुणाल कामराची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. न्यायमूर्ती एम. मोडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. कुणाल कामरा प्रकरणाशी संबंधित सुनावणी सुरू राहणार आहे.



कुणाल कामरा सध्या चेन्नईच्या घरी वास्तव्यास आहे. यामुळे पोलिसांना चौकशी करायची असेल तर चेन्नईत जाऊन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करावी लागणार आहे.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

Mumbai Port : मुंबई बंदर होणार 'प्रदूषणमुक्त'! JNPA मध्ये हायटेक सुविधा, मालवाहतूक होणार सुपरफास्ट...मुंबई बंदराने काढली पहिली निविदा

मुंबई : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता, मुंबई बंदर प्राधिकरणाने 'हरित बंदर' (Green Port) बनण्याच्या

आज मतदानदिनी मेट्रो-३ मध्यरात्रीपर्यंत धावणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आज १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई सज्ज झाली आहे.

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१