कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन कुणाल कामरा याची मुंबई पोलीस चौकशी करू शकतात. पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत कुणालला अटकेपासून संरक्षण देण्यात येत आहे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्देशांमुळे कुणाल कामरावरील अटकेची टांगती तलवार सध्या दूर झाल्याचे चित्र आहे. न्यायालयाकडून कुणाल कामराला हा दिलासा मिळाला आहे.



स्टँड-अप कॉमेडी शो करताना कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी खार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आली आहे. ही एफआयआर रद्द करण्याची कुणाल कामराची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. न्यायमूर्ती एम. मोडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. कुणाल कामरा प्रकरणाशी संबंधित सुनावणी सुरू राहणार आहे.



कुणाल कामरा सध्या चेन्नईच्या घरी वास्तव्यास आहे. यामुळे पोलिसांना चौकशी करायची असेल तर चेन्नईत जाऊन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करावी लागणार आहे.
Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल