भारताने दिला पहिला दणका, लष्कर - ए - तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला पहिले मोठे यश मिळाले आहे.



ठोस माहिती मिळताच बांदीपोरात घेराव घालून भारताच्या सुरक्षा पथकांनी लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवून जवानांनी लष्कर - ए - तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा केला.



अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल रोजी २६ पर्यटकांची हत्या केली. यानंतर शुक्रवार २५ एप्रिल रोजी भारतीय सुरक्षा पथकाने बांदीपोरात लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले.
Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन