Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२५ मध्ये त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जळलेली आढळल्याच्या न्यायमूर्ती वर्मा देशभरात चर्चेचा विषय ठरले होते.


न्यायमूर्ती वर्मा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना १४ मार्च २०२५ रोजी त्यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आग लागली होती. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाला त्यांच्या घरातील स्टोअर रूममध्ये जळालेल्या नोटांच्या मोठ्या गड्ड्या आढळून आल्या होत्या. त्या वेळी न्यायमूर्ती वर्मा घरी उपस्थित नव्हते; ते मध्य प्रदेशात होते.



ही घटना समोर आल्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय अंतर्गत समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालात प्राथमिक स्तरावर आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद करण्यात आले होते.यानंतर सरन्यायमूर्तींनी न्या. वर्मा यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यानंतर त्यांचे न्यायिक कामकाज काढून घेण्यात आले आणि त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली. अंतर्गत चौकशी अहवाल राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पाठवण्यात आला होता. त्यानंतर लोकसभेतील १४६ खासदारांनी त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला होता. हा प्रस्ताव स्वीकारून पुढील चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती.

Comments
Add Comment

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात

Kanpur Shocker : कानपूरमध्ये SSC-GD परीक्षेचा बोजवारा! एकाच केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची गर्दी; दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द

कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला.