Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२५ मध्ये त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जळलेली आढळल्याच्या न्यायमूर्ती वर्मा देशभरात चर्चेचा विषय ठरले होते.


न्यायमूर्ती वर्मा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना १४ मार्च २०२५ रोजी त्यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आग लागली होती. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाला त्यांच्या घरातील स्टोअर रूममध्ये जळालेल्या नोटांच्या मोठ्या गड्ड्या आढळून आल्या होत्या. त्या वेळी न्यायमूर्ती वर्मा घरी उपस्थित नव्हते; ते मध्य प्रदेशात होते.



ही घटना समोर आल्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय अंतर्गत समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालात प्राथमिक स्तरावर आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद करण्यात आले होते.यानंतर सरन्यायमूर्तींनी न्या. वर्मा यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यानंतर त्यांचे न्यायिक कामकाज काढून घेण्यात आले आणि त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली. अंतर्गत चौकशी अहवाल राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पाठवण्यात आला होता. त्यानंतर लोकसभेतील १४६ खासदारांनी त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला होता. हा प्रस्ताव स्वीकारून पुढील चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती.

Comments
Add Comment

ISSF World Cup : चिनी खेळाडूला धूळ चारत ईशा सिंगने जिंकले सुवर्णपदक; कोण आहे इशा सिंग ? मनू भाकरला कांस्यपदकावर मानावे लागले समाधान

हांगझोऊ : जागतिक क्रीडा जगतात भारतीय नेमांबाजांनी पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे

Bihar Student Protest : बिहार बंद आंदोलनादरम्यान गोळीबार, AK-47 वापरल्याप्रकरणी पोलीस निलंबित, व्हिडिओ व्हायरल

बिहारमध्ये पेपरफुटी प्रकरणासह (Bihar) विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या 'बिहार बंद' (Bihar Band)

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी