INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय आणि लष्करी घडामोडींकडे अनेकांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आयएनएस सूरत या विनाशिकेवरुन भारताने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ७० किमी. पर्यंतच्या लक्ष्याला अचूक हल्ला करुन नष्ट करण्यास सक्षम आहे.





भारताने ज्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली ते स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र (indigenous guided missile) आहे. भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलासाठी हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.



अरबी समुद्रात आयएनएस विक्रांत

भारत - पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेची नियुक्ती अरबी समुद्रात करण्यात आली आहे. कोणतीही विमानवाहक नौका समुद्रात तैनात असते त्यावेळी त्या नौकेच्या भोवताली युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या यांचा ताफा असतो. या व्यवस्थेनुसार आयएनएस विक्रांत इतर लढाऊ नौकांचा ताफा अरबी समुद्रात नियुक्त करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर मिग २९ के लढाऊ विमानांचा ताफा आणि कामोव्ह ३१ लढाऊ हेलिकॉप्टरचा ताफा आहे. ही नौका २६२ मीटर लांब आणि ५९ मीटर रुंद आहे. आयएनएस विक्रांत एकावेळी किमान ४० लढाऊ विमानांचा ताफा स्वतःसोबत घेऊन फिरण्यास सक्षम आहे. शिवाय या नौकेवर किमान ६४ बराक क्षेपणास्त्र कोणत्याही वेळी तयार स्थितीत ठेवली जातात. ही नौका जगातील सर्वोत्तम दहा विमानवाहक नौकांपैकी एक आहे.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव