आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावादरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या व्यापारी मार्गात अडथळे आणल्याने जगभरात होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम भारतामध्येही दिसू लागला आहे. अदानी टोटल गॅसने औद्योगिक गॅसची किंमत तब्बल तिप्पटीने वाढवून थेट ४० रुपयांवरून ११९ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरवर नेली आहे. त्यामुळे हे टंचाईचे संकट अधिक काळ सुरू राहिल्यास उद्योग, शेती, वीज व दररोजच्या वापरातील अनेक गोष्टी कमालीच्या महाग होऊ शकतात.


२८ फेब्रुवारीला अमेरिका व इस्राइलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मार्ग हा जहाजांसाठी धोकादायक असल्याची घोषणा केली होती. जगभरातील इंधनाच्या पुरवठ्यापैकी बहुतांश पुरवठा हा याच मार्गाने होत असल्याने जागतिक इंधनाच्या बाजारात खळबळ उडाली. तसेच येथून होणाऱ्या वाहतुकीमध्ये घट झाली. त्यामुळे अनेक टँकर समुद्रातच उभे राहिल्याने जगभरातील इंधन पुरवठा विस्कळीत झाला.


२ मार्च रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कतारला आपल्याकडील एलएनजीचे उत्पादन थांबवावे लागले. हे जगातील सर्वात मोठे एलएनजी निर्यात केंद्र असल्याचे मानले जाते. तसेच भारत कतारमधूनच दरवर्षी २.७ कोटी टन एवढा एलएनजी आयात करतो. जे भारताच्या एलएनजीच्या आयातीच्या ४० टक्के एवढे प्रमाण आहे. त्यामुळे कतारच्या या निर्णयामुळे येत्या काळात भारतात एलएनजीच्या किमती आणखी भडकू शकतात. भारतात एलएनजीचा सर्वाधिक वापर हा उद्योगांमध्ये होत असल्याने याचा परिणाम देशातील एकूण महागाईवर होऊ शकतो तसेच दैनंदिन वापरातील अनेक वस्तू महाग होऊ शकतात.

Comments
Add Comment

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर

University in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी