आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावादरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या व्यापारी मार्गात अडथळे आणल्याने जगभरात होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम भारतामध्येही दिसू लागला आहे. अदानी टोटल गॅसने औद्योगिक गॅसची किंमत तब्बल तिप्पटीने वाढवून थेट ४० रुपयांवरून ११९ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरवर नेली आहे. त्यामुळे हे टंचाईचे संकट अधिक काळ सुरू राहिल्यास उद्योग, शेती, वीज व दररोजच्या वापरातील अनेक गोष्टी कमालीच्या महाग होऊ शकतात.


२८ फेब्रुवारीला अमेरिका व इस्राइलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मार्ग हा जहाजांसाठी धोकादायक असल्याची घोषणा केली होती. जगभरातील इंधनाच्या पुरवठ्यापैकी बहुतांश पुरवठा हा याच मार्गाने होत असल्याने जागतिक इंधनाच्या बाजारात खळबळ उडाली. तसेच येथून होणाऱ्या वाहतुकीमध्ये घट झाली. त्यामुळे अनेक टँकर समुद्रातच उभे राहिल्याने जगभरातील इंधन पुरवठा विस्कळीत झाला.


२ मार्च रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कतारला आपल्याकडील एलएनजीचे उत्पादन थांबवावे लागले. हे जगातील सर्वात मोठे एलएनजी निर्यात केंद्र असल्याचे मानले जाते. तसेच भारत कतारमधूनच दरवर्षी २.७ कोटी टन एवढा एलएनजी आयात करतो. जे भारताच्या एलएनजीच्या आयातीच्या ४० टक्के एवढे प्रमाण आहे. त्यामुळे कतारच्या या निर्णयामुळे येत्या काळात भारतात एलएनजीच्या किमती आणखी भडकू शकतात. भारतात एलएनजीचा सर्वाधिक वापर हा उद्योगांमध्ये होत असल्याने याचा परिणाम देशातील एकूण महागाईवर होऊ शकतो तसेच दैनंदिन वापरातील अनेक वस्तू महाग होऊ शकतात.

Comments
Add Comment

Iranian crude oil : इराणी कच्च्या तेलाचा कार्गो चीनकडे वळवला गेल्याच्या बातम्या तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या, सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इराणी कच्च्या तेलाचा एक कार्गो पेमेंटशी संबंधित अडचणींमुळे गुजरातमधील वाडीनार

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही