पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर राष्ट्रहिताच्या निर्णयांद्वारे दाखवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना पुढील ३ दिवसांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपर्यंतच वैध राहणार आहेत, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.





विशेष म्हणजे, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही ७२ तासांच्या आत देश सोडावा लागणार आहे. याअंतर्गत कोणालाही भारतात परतण्याची किंवा थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही.


दरम्यान, जे भारतीय नागरिक सध्या पाकिस्तानात आहेत त्यांना तातडीने भारतात परतण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर गुरुवारी (२४ एप्रिल) अनेक पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.



भारत सरकारचा हा निर्णय केवळ सुरक्षा पावले उचलणं नव्हे, तर पाकिस्तानच्या दहशतवाद पुरस्कृत धोरणांना दिलेला स्पष्ट इशारा मानला जात आहे. आता देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार कोणते आणखी कडक निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Gas Supply Changes : स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल

नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला