पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर राष्ट्रहिताच्या निर्णयांद्वारे दाखवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना पुढील ३ दिवसांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपर्यंतच वैध राहणार आहेत, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.





विशेष म्हणजे, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही ७२ तासांच्या आत देश सोडावा लागणार आहे. याअंतर्गत कोणालाही भारतात परतण्याची किंवा थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही.


दरम्यान, जे भारतीय नागरिक सध्या पाकिस्तानात आहेत त्यांना तातडीने भारतात परतण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर गुरुवारी (२४ एप्रिल) अनेक पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.



भारत सरकारचा हा निर्णय केवळ सुरक्षा पावले उचलणं नव्हे, तर पाकिस्तानच्या दहशतवाद पुरस्कृत धोरणांना दिलेला स्पष्ट इशारा मानला जात आहे. आता देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार कोणते आणखी कडक निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Rainfall Deficit : देशात पावसाची एकूण तूट 24 टक्क्यांवर, आतापर्यंत 350 लाख हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण

नवी दिल्ली : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान

Rajasthan Gang-Rape Case : राजस्थानातील सामूहिक बलात्कार प्रकरणी एनसीडब्ल्यूचे 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : राजस्थानातील श्रीगंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार आणि मानवी तस्करी

Rain Alert : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; अनेक राज्यांत रेड व ऑरेंज अलर्ट

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत देशातील

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; ईडीने ४४० कोटींच्या ठेवी गोठवल्या

कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धनशोधन प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत कारवाई करत तृणमूल काँग्रेसच्या

PM Narendra Modi : इंडोनेशिया दौरा पूर्ण करून पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाकडे रवाना; लढाऊ विमानांकडून विशेष एस्कॉर्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडोनेशियातील तीन दिवसांचा अधिकृत दौरा पूर्ण करून बुधवारी

Khan Sir : खान सरांच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय १० जुलैला, पाटणा दिवाणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला

पाटणा : कोचिंग वादाशी संबंधित गोळीबार प्रकरणात आरोपी असलेले शिक्षक फैसल खान उर्फ खान सर आणि त्यांच्या दोन