Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने या प्रकरणात पहिल्यांदाच सुरक्षेतील गाफीलपणाची कबुली दिली आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, एकही दहशतवादी वाचणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्राने मांडली आहे.


आज दिल्लीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली. “या घटनेत सुरक्षा यंत्रणांकडून चूक झाली असून तिचे गांभीर्याने परीक्षण सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले. बैठकीत उपस्थित सर्व पक्षांनी सरकारच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आश्वासन दिले.



गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती स्थिर होती. पर्यटन, व्यवसाय आणि सामान्य जीवन सुरळीत सुरू होते. मात्र पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतीचा चेहरा समोर आला. बैठकीत अनेक नेत्यांनी ही परिस्थिती बदलण्याची गरज अधोरेखित केली.


हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात काही धोरणात्मक निर्णय घेतले, त्यात सर्वात ठळक म्हणजे चिनाब नदीचे पाणी थांबवणे. भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला असून, त्यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत.


दरम्यान, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सरकारनेही तत्काळ आपत्कालीन बैठक घेतली. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)