पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द...


भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली?


जम्मू : काश्मीरमधील निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षा यंत्रणा अतिरेकी शोध मोहीमेसह उच्चस्तरावर अलर्ट मोडवर आहेत. भारताचे युद्धसज्ज पवित्रा पाहून पाकिस्तानमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय प्रतिहल्ल्याची धास्ती घेऊन पाकिस्ताननं एलओसीजवळची गावं तातडीनं रिकामी केली असून, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.


दहशतवाद्यांच्या कुरापतींचं खापर आता पाकिस्तानच्या डोक्यावर फुटत असून, त्यांच्याच संरक्षणाखाली फोफावलेल्या अतिरेक्यांनी पुन्हा एकदा भारतीय पर्यटकांना लक्ष्य केल्यानं देशभरात संतापाचा भडका उडाला आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेनजीक प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे, तर संरक्षण यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे.



सर्जिकल स्ट्राइक, हवाई हल्ला किंवा यावेळी समुद्रमार्गेही कारवाई होण्याची शक्यता पाकिस्ताननं गृहीत धरली असून, सीमेलगतची अनेक गावं रिकामी केली जात आहेत. पाकिस्तानी नौदलाच्या कवायती देखील सुरू आहेत.



पाकिस्तानने भारताच्या सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. फक्त जमिनीवरूनच नाही तर समुद्रातूनही. लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर, पहलगामनंतर भारतीय नौदल प्रत्युत्तर देऊ शकते अशी भीती आता पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानने लगेचच त्यांच्या नौदलाच्या थेट गोळीबाराच्या सरावाचा इशारा दिला. पाकिस्तानने अरबी समुद्रात दोन दिवसांसाठी 'नवरेआ अलर्ट' जारी केला आहे. २३ एप्रिल रोजी थेट गोळीबाराचा इशारा देण्यात आला. हा सराव २४ ते २५ एप्रिल दरम्यान आहे. या इशाऱ्यात, कराची आणि ग्वादरजवळील विमाने आणि व्यापारी जहाजांना या सरावाच्या क्षेत्रापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. या सरावात, पाकिस्तानी नौदलाने पृष्ठभागावर आणि जमिनीखाली थेट गोळीबार केला.


पाकिस्तानमध्ये सध्या कमालीचा गोंधळ असून, लढाऊ विमाने रात्री आकाशात घिरट्या घालत आहेत, तर उच्चस्तरीय लष्करी बैठकांमधून बचावाचे उपाय शोधले जात आहेत.


बालाकोटच्या धडकीदायक आठवणी पाकिस्तानच्या अजून ताज्या असतानाच, भारताकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईची भीती त्यांच्या मनात घर करून बसली आहे. त्यातच भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडला अलर्टवर ठेवण्यात आलं असून, युद्धनौका सज्ज करण्यात आल्या आहेत.


संपूर्ण सीमावर्ती वातावरण तणावपूर्ण बनलं असून, भारत आता संयमाच्या सीमारेषेवर आहे. मात्र, जर पुन्हा असा हल्ला झाला, तर भारताकडून कठोर आणि निर्णायक पावले उचलली जातील, हे नक्की!

Comments
Add Comment

Chilling Robbery Caught On Cam : दुकानात शिरला अन् माथेफिरूकडून भारतीय महिलेवर गोळीबार; अमेरिकेत दरोड्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली

Russia attacks on Ukraine : रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले;’ओरेश्निक’सह हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर

मॉस्को : रशियाने शनिवारी रात्रभर युक्रेनवर जोरदार हल्ले करत हायपरसॉनिक ‘ओरेश्निक’सह चार प्रकारच्या

Balochistan Blast : बलुचिस्तान हादरलं! ट्रेनजवळ भीषण आत्मघाती स्फोट; ३० ठार, २२ जण गंभीर जखमी

बलुचिस्तान : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा भीषण हिंसाचाराने हादरला आहे. क्वेटा शहराजवळील चमन गेट

Shooting Outside White House : अमेरिकेत व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत व्हाईट हाऊस बाहेर गेट जवळ गोळीबार झाला. एका व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या बॅगेतून

China coal mine : कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, 90 कामगारांचा मृत्यू , अनेकजण बेपत्ता

Major accident in China's coal mine : चीनच्या शांक्सी प्रांतात एका मोठी दुर्घटना घडली आहे. शांक्सी प्रांतात असलेल्या कोळसा खाणीत ही

दुबईत झाडाला पिकलाय आंबा गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलचं मराठी गाणं ट्रेंडिगला

मराठमोळा संगीतकार सागर पाटिल याने रचला इतिहास, दुबईत प्रदर्शित केले “मॅंगो अॅंथम” हे मराठी गीत  दुबई:दुबईस्थित