घनदाट जंगलात ४८ तासांपासून सुरू आहे गोळीबार, सुरक्षा पथकाने अखेर घेरलंच

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा हा छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यातील घनदाट जंगलात किमान ३०० नक्षलवाद्यांना तीन हजारांपेक्षा जास्त जवानांनी घेरले आहे. नक्षलवादी आणि सुरक्षा पथकाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. जंगलात प्रमुख नक्षलवादी नेते लपले असल्याची ठोस माहिती हाती आल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घातला आणि चकमक सुरू झाली आहे. कारगेट्टा, नाडपल्ली, पुजारी कांकेर या डोंगरांमध्ये ठिकठिकाणी जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूने थांबून थांबून गोळीबार सुरू आहे.



नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईत महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा येथील नक्षलवाद विरोधी पथकांचे सुरक्षा जवान सहभागी झाले आहेत. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित उंचीवरुन जंगलाची पाहणी करण्याचे तसेच नक्षलवाद्यांच्या हालचालींचा अंदाज घेऊन त्यानुसार कारवाई करण्याचे काम जवान करत आहेत.



नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईची देखरेख आणि नियंत्रण तेलंगणातून सुरू आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी आणि बीजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव हे दोघे नियंत्रण कक्षातून कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सतत नियंत्रण कक्षाकडून कारवाईत आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती घेत आहेत.

सध्या नक्षलवाद्यांना २८० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात घेरण्यात आले आहे. हळू हळू जवान पुढे सरकत नक्षलवाद्यांना कमीत कमी जागेत घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. चकमक यशस्वी झाली तर नक्षलवाद्यांवर हा अलिकडच्या काळातला एक मोठा 'प्रहार' असेल. अद्याप या प्रकरणात प्रसिद्धपत्रक काढून अथवा पत्रकार परिषद घेऊन कोणतीही माहिती दिलेली नाही.
Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची