१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू...हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे कोचीमध्ये तैनात होते. त्यांचे १६ एप्रिलला लग्न झाले होते. ते हनीमूनसाठी काश्मीरमध्ये आले होते. मात्र दुर्देवाने त्यांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.


लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणातील मूळ निवासी आहेत. त्यांची पत्नी सुरक्षित आहे. हे दाम्पत्य सोमवारी श्रीनगर येथे पोहोचले होते. आधी पहलगाम फिरण्यासाठी गेले होते. घटनेनंतर पत्नीचा आपल्या पतीसोबतच्या मृतदेहासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



हरयाणाचे मूळ निवासी


विनय नरवाल हे कर्नालच्या सेक्टर ७ येथे राहणारे होते. दोन वर्षांपूर्वीच ते नौदलात दाखल झाले होते. विनय सोमवारी श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचे कुटुंबीय कर्नालच्या सेक्टर ७मध्ये राहतात. घटनेची सूचना मिळताच कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरसाठी रवाना झाले.



आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि...


या घटनेनंतर पत्नीने थरथरत्या आवाजात सांगितले, आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि त्यांनी माझ्या पतीवर गोळी झाडली. महिलेने सांगितले, की बंदुकधाऱ्यांनी सांगितले की माझे पती मुसलमान नाहीत आणि त्यांना गोळी मारली.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे