१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू...हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे कोचीमध्ये तैनात होते. त्यांचे १६ एप्रिलला लग्न झाले होते. ते हनीमूनसाठी काश्मीरमध्ये आले होते. मात्र दुर्देवाने त्यांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.


लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणातील मूळ निवासी आहेत. त्यांची पत्नी सुरक्षित आहे. हे दाम्पत्य सोमवारी श्रीनगर येथे पोहोचले होते. आधी पहलगाम फिरण्यासाठी गेले होते. घटनेनंतर पत्नीचा आपल्या पतीसोबतच्या मृतदेहासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



हरयाणाचे मूळ निवासी


विनय नरवाल हे कर्नालच्या सेक्टर ७ येथे राहणारे होते. दोन वर्षांपूर्वीच ते नौदलात दाखल झाले होते. विनय सोमवारी श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचे कुटुंबीय कर्नालच्या सेक्टर ७मध्ये राहतात. घटनेची सूचना मिळताच कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरसाठी रवाना झाले.



आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि...


या घटनेनंतर पत्नीने थरथरत्या आवाजात सांगितले, आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि त्यांनी माझ्या पतीवर गोळी झाडली. महिलेने सांगितले, की बंदुकधाऱ्यांनी सांगितले की माझे पती मुसलमान नाहीत आणि त्यांना गोळी मारली.

Comments
Add Comment

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा