नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे कोचीमध्ये तैनात होते. त्यांचे १६ एप्रिलला लग्न झाले होते. ते हनीमूनसाठी काश्मीरमध्ये आले होते. मात्र दुर्देवाने त्यांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.
लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणातील मूळ निवासी आहेत. त्यांची पत्नी सुरक्षित आहे. हे दाम्पत्य सोमवारी श्रीनगर येथे पोहोचले होते. आधी पहलगाम फिरण्यासाठी गेले होते. घटनेनंतर पत्नीचा आपल्या पतीसोबतच्या मृतदेहासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विनय नरवाल हे कर्नालच्या सेक्टर ७ येथे राहणारे होते. दोन वर्षांपूर्वीच ते नौदलात दाखल झाले होते. विनय सोमवारी श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचे कुटुंबीय कर्नालच्या सेक्टर ७मध्ये राहतात. घटनेची सूचना मिळताच कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरसाठी रवाना झाले.
या घटनेनंतर पत्नीने थरथरत्या आवाजात सांगितले, आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि त्यांनी माझ्या पतीवर गोळी झाडली. महिलेने सांगितले, की बंदुकधाऱ्यांनी सांगितले की माझे पती मुसलमान नाहीत आणि त्यांना गोळी मारली.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…