Pahalgam Terror Attack: प्रविण तरडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, पहलगाम हल्ल्यात गमावला जीवलग मित्र

पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी आपला जवळचा मित्र गमावला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली.


भारताचे स्वित्झरलँड म्हणून ओळखले जाणारे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवार, दिनांक 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्यात 28 निरपराध लोकांचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या धक्कादायक घटनेच्या विरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू आणि राजकीय व्यक्तिमत्वांनी या घटनेविरुद्ध निषेध आणि शोक व्यक्त केला. ज्यात मराठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांनी देखील या घटनेसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टद्वारे त्यांनी लोकांना आणखीन एक धक्का दिला आहे. तो म्हणजे, या हल्ल्यात त्यांनी त्यांचा जिवलग मित्र गमावल्याचे सांगितले आहे.



आतंकवाद आज घरात आला...



प्रविण तरडेने पोस्ट शेअर करत पहलगाम हल्ल्यात जवळचा मित्र गमावल्याची माहिती दिली. त्याने पोस्ट शेअर करत लिहिलं, 'आतंकवाद आज घरात आला..माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला. मित्रा संतोष माफ कर आम्हाला. आम्ही काही करु शकत नाही.' ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, लोकं कमेंटमध्ये दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत.

Comments
Add Comment

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत