PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेलेंचा समावेश आहे. तर पनवेलच्या दिलीप डिसलेंचाही या भ्याड हल्यात मृत्यू झाला आहे. पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगरमध्ये उपचार सुरू आहेत.


अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेच्या ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहतात. अतुल मोने हे पत्नी आणि मुलीसह पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.


अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवली भाग शाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले हेदेखील त्यांच्या कुटुंबास पहलगामला गेले होते. या हल्ल्यात हेमंत जोशी आणि संजय लेलेंनाही प्राण गमावावे लागले.


अतुल मोने हे रेलेच्या परळ येथील वर्क शॉप विभागात सेक्शन इंजिनीअर पदावर कार्यरत होते. तर पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हे दोन पर्यटकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती काश्मीर प्रशासनाने दिली.


पुण्याचे जगदाळे पती-पत्नी आणि गणबोटे दाम्पत्य, घोड्यावर बसलेले असताना नाव विचारून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या कुटुंबांशी माझा संपर्क झाला आहे. या कुटुंबातील सगळ्या महिला सुरक्षित आहेत. लवकरच त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे अशी माहीती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Comments
Add Comment

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना