PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेलेंचा समावेश आहे. तर पनवेलच्या दिलीप डिसलेंचाही या भ्याड हल्यात मृत्यू झाला आहे. पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगरमध्ये उपचार सुरू आहेत.


अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेच्या ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहतात. अतुल मोने हे पत्नी आणि मुलीसह पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.


अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवली भाग शाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले हेदेखील त्यांच्या कुटुंबास पहलगामला गेले होते. या हल्ल्यात हेमंत जोशी आणि संजय लेलेंनाही प्राण गमावावे लागले.


अतुल मोने हे रेलेच्या परळ येथील वर्क शॉप विभागात सेक्शन इंजिनीअर पदावर कार्यरत होते. तर पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हे दोन पर्यटकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती काश्मीर प्रशासनाने दिली.


पुण्याचे जगदाळे पती-पत्नी आणि गणबोटे दाम्पत्य, घोड्यावर बसलेले असताना नाव विचारून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या कुटुंबांशी माझा संपर्क झाला आहे. या कुटुंबातील सगळ्या महिला सुरक्षित आहेत. लवकरच त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे अशी माहीती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे