पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

  48

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. पाकिस्तानवर आधी सर्जिकल स्ट्राईक, नंतर एअर स्ट्राईक करणारा भारत आता काय करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रश्नाचे उत्तर गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान मोदी देतील, असे सूत्रांकडून समजते. पहलगामच्या घटनेनंतरची पंतप्रधान मोदींची पहिली जाहीर सभा गुरुवारी बिहारमध्ये आहे. ही सभा दरभंगा येथे होणार आहे.



पुलवामा येथे २०१९ मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी सीआरपीएफच्या वाहनांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला होता. यानंतर राजस्थानमध्ये चुरू येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षा पथकांना योग्य ती कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे सांगितले होते. यानंतर भारताच्या हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन अतिरेक्यांविरोधात कारवाई केली होती. थेट पाकिस्तानमध्ये जाऊन ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे आता गुरुवारी मोदी दरभंगामध्ये काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.



पहलगाम अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक

पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतरच्या महत्त्वाच्या घडामोडी

  1. दिल्लीत केंद्रीय संरक्षण समितीची बैठक

  2. जम्मू काश्मीरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ

  3. दिल्ली आणि काश्मीरमध्ये सुरक्षेशी संबंधित बैठकांना वेग

  4. तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

Comments
Add Comment

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी