पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. पाकिस्तानवर आधी सर्जिकल स्ट्राईक, नंतर एअर स्ट्राईक करणारा भारत आता काय करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रश्नाचे उत्तर गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान मोदी देतील, असे सूत्रांकडून समजते. पहलगामच्या घटनेनंतरची पंतप्रधान मोदींची पहिली जाहीर सभा गुरुवारी बिहारमध्ये आहे. ही सभा दरभंगा येथे होणार आहे.



पुलवामा येथे २०१९ मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी सीआरपीएफच्या वाहनांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला होता. यानंतर राजस्थानमध्ये चुरू येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षा पथकांना योग्य ती कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे सांगितले होते. यानंतर भारताच्या हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन अतिरेक्यांविरोधात कारवाई केली होती. थेट पाकिस्तानमध्ये जाऊन ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे आता गुरुवारी मोदी दरभंगामध्ये काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.



पहलगाम अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक

पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतरच्या महत्त्वाच्या घडामोडी

  1. दिल्लीत केंद्रीय संरक्षण समितीची बैठक

  2. जम्मू काश्मीरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ

  3. दिल्ली आणि काश्मीरमध्ये सुरक्षेशी संबंधित बैठकांना वेग

  4. तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या