पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. पाकिस्तानवर आधी सर्जिकल स्ट्राईक, नंतर एअर स्ट्राईक करणारा भारत आता काय करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रश्नाचे उत्तर गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान मोदी देतील, असे सूत्रांकडून समजते. पहलगामच्या घटनेनंतरची पंतप्रधान मोदींची पहिली जाहीर सभा गुरुवारी बिहारमध्ये आहे. ही सभा दरभंगा येथे होणार आहे.



पुलवामा येथे २०१९ मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी सीआरपीएफच्या वाहनांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला होता. यानंतर राजस्थानमध्ये चुरू येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षा पथकांना योग्य ती कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे सांगितले होते. यानंतर भारताच्या हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन अतिरेक्यांविरोधात कारवाई केली होती. थेट पाकिस्तानमध्ये जाऊन ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे आता गुरुवारी मोदी दरभंगामध्ये काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.



पहलगाम अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक

पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतरच्या महत्त्वाच्या घडामोडी

  1. दिल्लीत केंद्रीय संरक्षण समितीची बैठक

  2. जम्मू काश्मीरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ

  3. दिल्ली आणि काश्मीरमध्ये सुरक्षेशी संबंधित बैठकांना वेग

  4. तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे