१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन जणांना ५ वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. या प्रकरणात विजया बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक दामोधर कामत, माधव एंटरप्रायझेसचे मालक निखिल पट आणि एजंट सुरज तायडे दोषी ठरले.


या घोटाळ्याची सुरुवात २०१२ मध्ये झाली होती. कामत यांनी बनावट LC जारी केल्यावर बँक ऑफ इंडिया (BOI)च्या विलेपार्ले शाखेकडून १० कोटी रुपये मंजूर झाले. पाचवे LC देताना संशय आल्याने चौकशी झाली आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला.



विशेष न्यायाधीश ए. व्ही. खरकर यांनी १७ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात कामत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी ठरवत १५ लाख दंड ठोठावला. निखिल पट यांना ८ कोटींचा दंड आणि सुरज तायडे यांना ३० लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे.


या प्रकरणात एक आरोपी मृत असून दोन फरार आहेत. सात आरोपींपैकी एका आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.


दरम्यान, देशाच्या आर्थिक रचनेवर घात करणाऱ्या पांढरपेशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे कठोर शिक्षा देणे आवश्यक होते, असे न्यायालयाने नमूद केले.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला नवा पर्याय

 नेरळ-शिरूर कॉरिडॉरला मंजुरी; १३३ किलोमीटर चौपदरी महामार्ग खासगी भागीदारीतून साकारणार मुंबई : मुंबई-पुणे

Govandi Crime : गोवंडीत ६ वर्षांच्या चिमुकल्यावर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार; 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील गोवंडी (Mumbai Govandi Area) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका

DC VS KKR : सलग चौथ्या विजयसाठी केकेआर सज्ज, दिल्लीसाठी करो या मरो चा सामना...

अरुण जेटली स्टेडियवर दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५१ वा सामना दिल्ली विरुद्ध केकेआर

PCOD Clinic : राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयांत आता 'पीसीओडी क्लिनिक'

दर १५ दिवसांनी तज्ज्ञ डॉक्टर भेट देणार; आरोग्यसेवा, सल्लाही विनामुल्य मुंबई : राज्यातील महिला आणि युवतींमध्ये

BMC News : महापालिकेत ठरावाच्या सूचना बाद होण्याची हॅट्रीक

सलग तिसऱ्या महिन्यात ठरावाच्या सूचना सभागृहात झाल्या रद्द मुंबई (सचिन धानजी) तब्बल पावणे चार वर्षांनंतर

Medical Store Close At 20 May : महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद; कारण वाचा...

येत्या २० मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या आणि रुग्णांच्या चिंतेत भर टाकणारी एक मोठी घडामोड समोर