ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा


सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणाचा संदर्भ देत माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे, राणे कुटुंबीय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना (शिंदे गट) यांच्यावर केलेल्या टीकेचा तीव्र निषेध करत माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी आज पत्रकार परिषदेत “निलेश राणे यांच्याशी पंगा नको!” असा थेट इशारा दिला.


महायुतीच्या कुडाळ येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कांदे यांनी वैभव नाईक यांच्यावर सवालांचा भडिमार करत गंभीर आरोप केले.


ते म्हणाले, “सिद्धेश शिरसाट वर्षभरातील ३०० दिवस कुडाळमधल्या एका हॉटेलमध्ये बसायचा… ते हॉटेल कोण चालवतं? त्याचं उद्घाटन वैभव नाईक यांच्या हस्तेच झालंय. मग संबंध कुणाचा अधिक जवळचा आहे?”


कांदे यांनी पुढे थेट नाव घेत वैभव नाईक यांचे कार्यकर्ते अक्रम राठी, ताबीश नाईक, आणि गांजाप्रकरणातील आरोपी यांचे फोटो, कार्यक्रमांतील सहभाग, आणि वाळू तस्करीसंबंधित कारवाई यांचा उल्लेख करत विचारलं – “तुम्ही अशा टोळीचे आका आहात का?”


तसेच, बिडवलकर प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट याचा राणे यांच्यासोबत फोटो असला तरी, शिरसाटची शिंदे गटातली 'एन्ट्री' श्रीराम मंदिर रॅलीदरम्यान झाली, आणि त्या वेळी निलेश राणे भाजपात होते, असे त्यांनी स्पष्ट केले.


शेवटी कांदे यांनी इशारावजा शब्दात सांगितले की, “ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे. आ. राणेंवर उगाच आरोप केल्यास आम्ही एकत्र येऊन जशास तसे उत्तर देऊ.”


महायुती एकसंध असून, निलेश राणे यांचे लोकांमध्ये प्रचंड बळ आहे आणि पुढील निवडणुकीतही ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा

SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे