आईस्क्रीम कारखान्यातील धक्कादायक घटना, कामगारांना दिली अशी वागणूक की प्राणीही घाबरावेत !

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन दोन कामगारांना अमानवी अशी वागणूक दिली. मालकाचे कृत्य एवढे भयानक होते की ते बघून जंगली प्राणीही घाबरावेत. चोरीच्या संशयावरुन आईस्क्रीम कारखान्याच्या मालकाने दोन कामगारांना अर्धनग्न केले. कपडे काढून कामगारांची अंगझडती घेण्यात आली. काही सापडले नाही म्हणून चोरी करुन पैसे कुठे लपवलेत ? असा प्रश्न विचारण्यात आला. खरं बोलत नाहीत, असं वाटलं म्हणून मालकाने कामगारांची नखं उपटली आणि त्यांना बेदम चोपले. हे कमी म्हणून मालकाने दोन्ही कामगारांना विजेचे शॉक दिले. गंभीर जखमी झालेले कामगार बेशुद्ध पडले त्यावेळी त्यांना मालकाने सोडून दिले. दोन्ही कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आले.



आपले सामान घेऊन कामगारांनी तातडीने राजस्थानमधील त्यांचे मूळ गाव गाठले. या ठिकाणी पोहोचल्यावर कामगारांनी स्थानिक पोलीस ठाण्यात कारखान्याच्या मालकाविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि तपास सुरू केला.



राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील अभिषेक भांभी आणि विनोद भांभी हे दोघे छत्तीसगडमधील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आइस्क्रीम कारखान्यात नोकरी करत होते. एका कंत्राटदाराच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काम व्यवस्थित सुरू होते. पण कारखान्याचे मालक छोटू गुर्जर आणि त्यांचे सहकारी मुकेश शर्मा यांनी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी या दोघांवर चोरीचा आरोप केला. यानंतर दोन्ही कामगारांना अमानवी वागणूक देण्यात आली. याआधी भांभी यांनी मालकाकडे वाहन कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी २० हजार रुपये मागितले होते. मालकाने पैसे देण्यास नकार दिल्यावर अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांनी नोकरी सोडत असल्याचे जाहीर केले. हे ऐकताच मालकाला राग आला. मालकाने त्याचे सहकारी मुकेश शर्मा याच्या मदतीने दोन्ही कामगारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी ऐकावे म्हणून त्यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला. यानंतर मालकाने दोन्ही कामगारांना अमानवी अशी वागणूक दिली. या वागणुकीमुळे गंभीर जखमी झालेले कामगार बेशुद्ध पडले त्यावेळी त्यांना मालकाने सोडून दिले. दोन्ही कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आले.

काम सुटताच अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांनी तडक राजस्थान गाठले आणि भिलवाडा जिल्ह्यातील मूळगावी पोहोचताच स्थानिक गावात पोलिसांकडे झिरो एफआयआर नोंदवली. या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पण काखान्यातील घटनेचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी मालकाविरुद्ध झिरो एफआयआर नोंदवली.
Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर