MI vs CSK Live Score, IPL 2025 :  रोहित-सूर्याचे वादळ, धोनीच्या चेन्नईवर मुंबईचा ९ विकेटनी विजय

  88

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला.  या सामन्यात मुंबईने चेन्नईवर ९ विकेटनी मात केली. 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. चेन्नईने शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ५ विकेट गमावत १७६ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर १६ षटकांतच हे आव्हान पूर्ण केले आणि ९ विकेटनी सामना जिंकला. 

१७७ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईने सुरूवात शानदार केली. रोहित शर्मा आणि रयान रिकल्टन कमालीच्या लयीमध्ये दिसली. दोघांमध्ये ६३ धावांची भागीदारी झाली. ७व्या षटकांत रिकल्टनला जडेजाने बाद केले. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यांच्यात तुफानी भागीदारी झाली. दोघांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने ४५ बॉलमध्ये नाबाद ७६ धावांची खेळी केली. यात ६ चौकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. तर सूर्याने ३० बॉलमध्ये ६८ धावांची तुफानी खेळी केली.

पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या चेन्नईची सुरूवात चांगली नाही. रचिन रवींद्र आणि शेख रशीदने संथ सुरूवात केली. चौथ्या षटकांत रचिन रवींद्रने आपली विकेट गमावली. यानंतर १७ वर्षाच्या आयुष म्हात्रेने कमालीची फलंदाजी केली. म्हात्रेने ३२ धावा केल्या.

 
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल