MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

  40

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर असल्यामुळे चेन्नईला फायदा झाला. आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे जे फलंदाजीला उपयुक्त आहे.


चेन्नई व मुंबई हे दोन्ही संघ ह्या हंगामात मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. दोन्ही संघ अगोदरचा सामना जिंकल्यामुळे दोन्ही संघाचे मनोबल उंचावले आहे व आता सर्वच संघात जिंकण्याची चढाओढ सुरु झाली आहे. मुंबईचा सलामीचा प्रश्न अजून सुटलेला नाही, अजूनही हिटमॅन रोहित शर्मा संघाला एक आश्वासक सुरवात करून देण्यात अपयशी ठरला आहे.


मधल्या फळीत विल जैक्सच्या रूपाने अजून एक फलंदाज मुंबईच्या संघात सामील झाला आहे त्यामुळे मुंबईसाठी ती एक जमेची बाजू आहे. गोलंदाजीमध्ये बुमराहचे आगमन मुंबईसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण शेवटच्या षटकात बोल्ट व पंड्या तेवढा प्रभावी ठरत नाही. चेन्नईच्या बाबतीत फलंदाजीमध्ये अजूनही हा संघ चाचपडताना दिसतो आहे. धोनीचे नेतृत्व फलंदाजीमध्ये कमी पडते आहे, तसेच शेवटच्या षटकात हाणामारी करण्यासाठी त्यांच्याकडे हीटरची कमतरता आहे. चला तर बघूया हार्दिक पंड्याचा संघ मागील पराभवाचा वचपा काढणार का?

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र