MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर असल्यामुळे चेन्नईला फायदा झाला. आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे जे फलंदाजीला उपयुक्त आहे.


चेन्नई व मुंबई हे दोन्ही संघ ह्या हंगामात मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. दोन्ही संघ अगोदरचा सामना जिंकल्यामुळे दोन्ही संघाचे मनोबल उंचावले आहे व आता सर्वच संघात जिंकण्याची चढाओढ सुरु झाली आहे. मुंबईचा सलामीचा प्रश्न अजून सुटलेला नाही, अजूनही हिटमॅन रोहित शर्मा संघाला एक आश्वासक सुरवात करून देण्यात अपयशी ठरला आहे.


मधल्या फळीत विल जैक्सच्या रूपाने अजून एक फलंदाज मुंबईच्या संघात सामील झाला आहे त्यामुळे मुंबईसाठी ती एक जमेची बाजू आहे. गोलंदाजीमध्ये बुमराहचे आगमन मुंबईसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण शेवटच्या षटकात बोल्ट व पंड्या तेवढा प्रभावी ठरत नाही. चेन्नईच्या बाबतीत फलंदाजीमध्ये अजूनही हा संघ चाचपडताना दिसतो आहे. धोनीचे नेतृत्व फलंदाजीमध्ये कमी पडते आहे, तसेच शेवटच्या षटकात हाणामारी करण्यासाठी त्यांच्याकडे हीटरची कमतरता आहे. चला तर बघूया हार्दिक पंड्याचा संघ मागील पराभवाचा वचपा काढणार का?

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख