Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई शहरात कामानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. मात्र आता मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक एक कायमस्वरूपी बंद होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांची फरफट होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता. मात्र प्रवाशांनी त्याला कडाडून विरोध केल्यानंतर रेल्वेकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाकडून हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मेगाब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बॅरिकेटिंग केलं जाणार आहे. याची प्रवाशांमध्ये कुठेही वाच्यता होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गोपनीयता पाळण्यात येत आहे.


सध्या अस्तित्वात असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा कायमस्वरूपी रेलिंग लावून बंद करण्यात येणार असल्याने बदलापूर पूर्वेकडे राहणाऱ्या प्रवाशांना मोठी फरफट होणार आहे. इतकच नाही तर पूर्वेकडील प्रवाशांना पश्चिमेकडे जाऊन मग प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून म्हणजे सध्याच्या होम प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडावी लागणार आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयानंतर बदलापूरकरांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड