वकिलांनो, AI तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या; एआयच्या मदतीने प्रलंबित खटल्यांमध्ये होऊ शकते घट

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत


मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हे तंत्रज्ञान न्याय व्यवस्थेत क्रांती घडवू शकते आणि प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असे प्रतिपादन बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांनी केले.


महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलतर्फे आयोजित केलेल्या "कृत्रिम बुद्धिमत्तेचा न्यायव्यवस्थेवर परिणाम" या विषयावर प्रादेशिक वकिलांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, तसेच न्यायमूर्ती एम. एस. सोनक, ए. एस. गडकरी आणि एम. एस. कर्णिकही उपस्थित होते.



न्यायमूर्ती सुंदरसन म्हणाले, “एआयचा वापर करून विविध प्रकरणांतील समान मुद्दे मशीनद्वारे सहज शोधता येऊ शकतात. उदाहरणार्थ, राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणात झालेल्या गणनात त्रुटी असलेल्या प्रकरणांत समान निवारण देता येईल. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या केसेस वेगाने निकाली काढता येतील.”


ते पुढे म्हणाले, “कर कायद्याच्या अर्थ लावण्यासंदर्भातील याचिकांमध्ये समान प्रश्न उद्भवतात, ते ओळखून AI च्या सहाय्याने एकत्र निर्णय घेता येऊ शकतो.” मात्र, त्यांनी यावेळी इशारा देत सांगितले की, AI चे धोकेही आहेत. मानवतेचा न्यायासाठी आवश्यक असलेला "समता भाव" यंत्रांमध्ये नसतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे.


AI च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर वकिलांनी या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. न्यायप्रक्रियेच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी AI हे महत्त्वाचे साधन ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या