वकिलांनो, AI तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या; एआयच्या मदतीने प्रलंबित खटल्यांमध्ये होऊ शकते घट

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत


मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हे तंत्रज्ञान न्याय व्यवस्थेत क्रांती घडवू शकते आणि प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असे प्रतिपादन बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांनी केले.


महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलतर्फे आयोजित केलेल्या "कृत्रिम बुद्धिमत्तेचा न्यायव्यवस्थेवर परिणाम" या विषयावर प्रादेशिक वकिलांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, तसेच न्यायमूर्ती एम. एस. सोनक, ए. एस. गडकरी आणि एम. एस. कर्णिकही उपस्थित होते.



न्यायमूर्ती सुंदरसन म्हणाले, “एआयचा वापर करून विविध प्रकरणांतील समान मुद्दे मशीनद्वारे सहज शोधता येऊ शकतात. उदाहरणार्थ, राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणात झालेल्या गणनात त्रुटी असलेल्या प्रकरणांत समान निवारण देता येईल. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या केसेस वेगाने निकाली काढता येतील.”


ते पुढे म्हणाले, “कर कायद्याच्या अर्थ लावण्यासंदर्भातील याचिकांमध्ये समान प्रश्न उद्भवतात, ते ओळखून AI च्या सहाय्याने एकत्र निर्णय घेता येऊ शकतो.” मात्र, त्यांनी यावेळी इशारा देत सांगितले की, AI चे धोकेही आहेत. मानवतेचा न्यायासाठी आवश्यक असलेला "समता भाव" यंत्रांमध्ये नसतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे.


AI च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर वकिलांनी या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. न्यायप्रक्रियेच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी AI हे महत्त्वाचे साधन ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती