वकिलांनो, AI तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या; एआयच्या मदतीने प्रलंबित खटल्यांमध्ये होऊ शकते घट

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत


मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हे तंत्रज्ञान न्याय व्यवस्थेत क्रांती घडवू शकते आणि प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असे प्रतिपादन बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांनी केले.


महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलतर्फे आयोजित केलेल्या "कृत्रिम बुद्धिमत्तेचा न्यायव्यवस्थेवर परिणाम" या विषयावर प्रादेशिक वकिलांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, तसेच न्यायमूर्ती एम. एस. सोनक, ए. एस. गडकरी आणि एम. एस. कर्णिकही उपस्थित होते.



न्यायमूर्ती सुंदरसन म्हणाले, “एआयचा वापर करून विविध प्रकरणांतील समान मुद्दे मशीनद्वारे सहज शोधता येऊ शकतात. उदाहरणार्थ, राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणात झालेल्या गणनात त्रुटी असलेल्या प्रकरणांत समान निवारण देता येईल. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या केसेस वेगाने निकाली काढता येतील.”


ते पुढे म्हणाले, “कर कायद्याच्या अर्थ लावण्यासंदर्भातील याचिकांमध्ये समान प्रश्न उद्भवतात, ते ओळखून AI च्या सहाय्याने एकत्र निर्णय घेता येऊ शकतो.” मात्र, त्यांनी यावेळी इशारा देत सांगितले की, AI चे धोकेही आहेत. मानवतेचा न्यायासाठी आवश्यक असलेला "समता भाव" यंत्रांमध्ये नसतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे.


AI च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर वकिलांनी या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. न्यायप्रक्रियेच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी AI हे महत्त्वाचे साधन ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.