Amravati Water Supply : अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद!

अमरावती : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात अमरावतीकरांवर पाणीसंकटाचा (Water Shortage) सामना करावा लागत आहे. अमरावती व बडनेरा शहरात पाणीगळतीची समस्या सुरु असल्यामुळे येथील पाणीपुरवठा दोन दिवस बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Amravati Water Supply)



मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती व बडनेरा शहरात पाईपलाईनमधून होत असलेल्या पाणी गळतीचा दोष दुरूस्तीच्या अनुषंगाने शहराचा पाणीपुरवठा २३ व २४ एप्रिलला पूर्णतः बंद राहणार आहे.अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या निरपिंगळाई बीपीटीपासून येणारी २५ मीमी व्यासाच्या पीएससी गुरूत्ववाहिनीमधून नांदगाव ते माहुली गावाच्या मध्ये पाणीगळती होत आहे. हा दोष दुरूस्त करण्याकरिता २२ ते २३ एप्रिल रोजी अमरावती व बडनेरा हरातचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Amravati Water Supply)


पाणीगळती दोष त्वरित दुरूस्त करण्यात येऊन पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. तरीपण नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून साठवून ठेवावे, असे आवाहन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये