अमरावती : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात अमरावतीकरांवर पाणीसंकटाचा (Water Shortage) सामना करावा लागत आहे. अमरावती व बडनेरा शहरात पाणीगळतीची समस्या सुरु असल्यामुळे येथील पाणीपुरवठा दोन दिवस बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Amravati Water Supply)
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती व बडनेरा शहरात पाईपलाईनमधून होत असलेल्या पाणी गळतीचा दोष दुरूस्तीच्या अनुषंगाने शहराचा पाणीपुरवठा २३ व २४ एप्रिलला पूर्णतः बंद राहणार आहे.अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या निरपिंगळाई बीपीटीपासून येणारी २५ मीमी व्यासाच्या पीएससी गुरूत्ववाहिनीमधून नांदगाव ते माहुली गावाच्या मध्ये पाणीगळती होत आहे. हा दोष दुरूस्त करण्याकरिता २२ ते २३ एप्रिल रोजी अमरावती व बडनेरा हरातचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Amravati Water Supply)
पाणीगळती दोष त्वरित दुरूस्त करण्यात येऊन पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. तरीपण नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून साठवून ठेवावे, असे आवाहन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…