PM Modi Spoke to Elon Musk : पंतप्रधान मोदी आणि एलोन मस्क यांच्या फोन कॉल्स नंतर भारतात टेस्ला येण्याचे संकेत

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते अनेक नवीन माणसांना भेटतात अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतात. फेब्रुवारी २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या काळात, ट्रम्प यांच्यासोबत, ते मस्क यांनाही भेटले. त्यानंतर आज (दि १८) पंतप्रधान मोदी यांनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलाॅन मस्क यांच्याशी फोनवर चर्चा केली.



या संभाषणात दोघांनीही भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनी या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण करून देत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या संभाषणात, भारतातील वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्र आणि मस्क यांच्या कंपन्यांमधील वाढत्या सहकार्यावरही विशेष लक्ष देण्यात आले. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टवर माहिती देत याबद्दल सांगितले आहे.





सोशल मीडियावर पोस्ट करत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


"मी मस्क यांच्याशी बोललो आणि या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसीमध्ये भेटलेल्या मुद्द्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या प्रचंड क्षमतेवर आम्ही चर्चा केली. भारत या क्षेत्रात अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यास पूर्णपणे तयार आहे."

Comments
Add Comment

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु

मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज

सरकारी योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांचा होणार गौरव

मुंबई : विविध योजनांमधून महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या रुग्णसेवांवरील खर्चाच्या

मुंबईच्या पदपथांची सुधारणा करणार, युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी अंतर्गत करणार विकास रस्ते विकासासाठी ६८७५ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई : युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी' अंतर्गत अधिक पादचारी अनुकूल व दिव्यांग अनुकूल पदपथ निर्माण करण्यावर

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती