Jagan Mohan Reddy : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींची ८०० कोटींची मालमत्ता जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली कठोर कारवाई


हैदराबाद : तब्बल १४ वर्षे जुन्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआर-काँग्रेस) प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याविरुद्धच्या चौकशीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ८०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार जगन मोहन रेड्डीच्या जप्त केलेल्या शेअर्सची किंमत सुमारे २७.५ कोटी रुपये आहे. याशिवाय, दालमिया सिमेंट्स (भारत) लिमिटेडची (डीसीबीएल) जमीन देखील जप्त करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत अंदाजे ३७७.२ कोटी रुपये आहे. दालमिया यांनी जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ७९३. कोटी रुपये आहे आणि ईडीने १४ वर्षांनंतर ही कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंगचे हे संपूर्ण प्रकरण फायदे मिळवण्याच्या उद्देशाने दिलेल्या मदतीबद्दल आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २०११ मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यानुसार ईडीने आता तात्पुरती मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.



सीबीआयने २०१३ मध्ये जगन मोहन रेड्डी, डीसीबीएल आणि काही इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर भ्रष्टाचाराशी संबंधित भारतीय कायदे आणि नियमांनुसार आरोप ठेवण्यात आले. या प्रकरणात ईश्वर सिमेंट्सच्या खाणकामाच्या जमिनीचे डीसीबीएलला हस्तांतरण करण्याचाही समावेश आहे. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की जगन रेड्डी यांनी त्यांचे जवळचे सहकारी व्ही. विजया साई रेड्डी आणि डीसीबीएलचे पुनीत दालमिया यांच्यासह रघुराम सिमेंट्स लिमिटेडमधील त्यांचे शेअर्स फ्रेंच कंपनीला विकण्याचा करार केला होता.

हा करार १३५ कोटी रुपयांना झाला होता. यापैकी ५५ कोटी रुपये जगन रेड्डी यांना हवालाद्वारे रोख स्वरूपात देण्यात आल्याचे सांगितले जाते. हे व्यवहार १६ मे २०१० ते १३ जून २०११ दरम्यान झाले. दिल्लीत जप्त केलेल्या काही कागदपत्रांवरून आयकर विभागाला या पैशाची माहिती मिळाली होती.
Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही