Jagan Mohan Reddy : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींची ८०० कोटींची मालमत्ता जप्त

  101

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली कठोर कारवाई


हैदराबाद : तब्बल १४ वर्षे जुन्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआर-काँग्रेस) प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याविरुद्धच्या चौकशीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ८०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार जगन मोहन रेड्डीच्या जप्त केलेल्या शेअर्सची किंमत सुमारे २७.५ कोटी रुपये आहे. याशिवाय, दालमिया सिमेंट्स (भारत) लिमिटेडची (डीसीबीएल) जमीन देखील जप्त करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत अंदाजे ३७७.२ कोटी रुपये आहे. दालमिया यांनी जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ७९३. कोटी रुपये आहे आणि ईडीने १४ वर्षांनंतर ही कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंगचे हे संपूर्ण प्रकरण फायदे मिळवण्याच्या उद्देशाने दिलेल्या मदतीबद्दल आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २०११ मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यानुसार ईडीने आता तात्पुरती मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.



सीबीआयने २०१३ मध्ये जगन मोहन रेड्डी, डीसीबीएल आणि काही इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर भ्रष्टाचाराशी संबंधित भारतीय कायदे आणि नियमांनुसार आरोप ठेवण्यात आले. या प्रकरणात ईश्वर सिमेंट्सच्या खाणकामाच्या जमिनीचे डीसीबीएलला हस्तांतरण करण्याचाही समावेश आहे. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की जगन रेड्डी यांनी त्यांचे जवळचे सहकारी व्ही. विजया साई रेड्डी आणि डीसीबीएलचे पुनीत दालमिया यांच्यासह रघुराम सिमेंट्स लिमिटेडमधील त्यांचे शेअर्स फ्रेंच कंपनीला विकण्याचा करार केला होता.

हा करार १३५ कोटी रुपयांना झाला होता. यापैकी ५५ कोटी रुपये जगन रेड्डी यांना हवालाद्वारे रोख स्वरूपात देण्यात आल्याचे सांगितले जाते. हे व्यवहार १६ मे २०१० ते १३ जून २०११ दरम्यान झाले. दिल्लीत जप्त केलेल्या काही कागदपत्रांवरून आयकर विभागाला या पैशाची माहिती मिळाली होती.
Comments
Add Comment

किश्तवाडमधील ढगफुटीत ४० हून अधिक जणांचा मृत्यू, १५० जण बेपत्ता

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. डोंगरावरून

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

स्वातंत्र्य दिनानिमित्त १०९० जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राचे मानकरी येथे पहा...

महाराष्ट्रातल्या ०७ पोलिसांना शौर्य पदक, ०३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक ३९ पोलिसांना

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले.

Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, किन्नौर ढगफुटीने उध्वस्त; घरं-गाड्या पुरात गेल्या वाहून

किन्नौर : हिमाचल प्रदेशात निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखवला आहे. किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी