मुंबई : डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत देशभरातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी मंदावली आहे. मालमत्तेच्या वाढत्या किंमतींमुळे घर खरेदी लांबणीवर टाकली जात आहे.
जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत देशभरातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांचा पुरवठा २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाला आहे. वाढत्या महागाईचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अस्थिरतेचा घरांच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
आयात शुल्क युद्ध आणि वाढती महागाई यामुळे घरांचा पुरवठा आणि घरांची खरेदी या दोन्हीत घट दिसून आल्याचे हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ध्रुव अग्रवाल म्हणाले.
जानेवारी-मार्च या तिमाहीत एक लाखांपेक्षा कमी घरे विकली गेली. या विश्लेषणात समाविष्ट करण्यात आलेल्या बहुतांशी शहरांत ही संख्या घटल्याचे दिसते. बंगळूर आणि चेन्नईमध्ये हा ट्रेंड दिसला नाही, तर हैदराबाद, मुंबई आणि पुण्यात ही विक्री तीव्रतेने कमी झालेली दिसली.
बंगळुरूमध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ११,७३१ घरांच्या विक्रीसह १३%ची वाढ पहायला मिळाली. चेन्नईमध्ये ही ४,७७४ घरांच्या विक्रीसह ८%ची वाढ झाली. या तुलनेत इतर प्रमुख शहरांत घरांच्या विक्रीत घसरण झालेली पहायाला मिळाली. यात अहमदाबाद १०,७३० (-१७%), दिल्ली एनसीआर ८४७७ (-१६%), हैदराबाद १०,४६७ (-२६%), कोलकाता ३,८०३ (-१%), मुंबई ३०,७०५ (-२६%), आणि पुणे १७,२२८ (-२५) येथे घरांची विक्री मंदावलेली दिसली.
मार्केट करेक्शनचे संकेत नवीन पुरवठ्यात जी घट आली आहे त्यातून देखील दिसत होते. आठ पैकी पाच शहरांतील नव्या घरांच्या लॉन्चच्या संख्येत वार्षिक घट दिसून आली. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादेत संख्येच्या दृष्टीने सर्वात तीव्र घसरण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.
पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये २०२४ च्या तुलनेत नवीन लॉन्च झालेल्या घरांच्या संख्येत क्रमशः १५,५४३ (-३८%), १०,१५६ (-३३%), २,३८४ (-२३%) ची घट झाली आहे. इतर प्रमुख शहरे जसे की चेन्नई ४,०७० (-१४%), मुंबई ३१,३२२ (-१५%) येथे ही नवीन लॉन्च प्रकल्पात घट झाली असल्याचे पहायला मिळाले. याउलट बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि कोलकाता येथे मात्र नवीन लॉन्च प्रकल्पात वाढ झाली आहे. ही वाढ क्रमशः १८,१८३ (८२%), ७,९५२ (१६%) आणि ३,५३४ (१३८%) इतकी आहे.
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…
रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…
मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…
मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…
रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…